शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन विभाग रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:18 IST

शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत एका हॉटेलला आग लागल्याने तब्बल १४ जणांना मृत्यू झाला. या घटनेने राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, मोठ्या शहरांमध्ये मॉल, चित्रपटगृह, हॉटेल, मोठ्या इमारतींमधील आग प्रतिबंधक यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी कारभार आलबेल असल्याचे चित्र समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत एका हॉटेलला आग लागल्याने तब्बल १४ जणांना मृत्यू झाला. या घटनेने राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, मोठ्या शहरांमध्ये मॉल, चित्रपटगृह, हॉटेल, मोठ्या इमारतींमधील आग प्रतिबंधक यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी कारभार आलबेल असल्याचे चित्र समोर आले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे निदर्शनास आले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने सर्वत्र तपासणीचे आदेश दिले.शहरात १६ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या शेकडो इमारती मागील काही वर्षांमध्ये तयार झाल्या आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा आवश्यक आहे. दरवर्षी अग्निशमन यंत्रणेची तपासणी करून नाहरकत प्रमाणपत्र मनपाकडून घेणे आवश्यक आहे. दवाखाने, मॉल, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी अग्निशमन यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. शहरातील ९० टक्के इमारतींमध्ये ही यंत्रणाच नाही. महापालिकेनेही कधी या इमारतींचे आॅडिट केलेले नाही. मुंबईच्या लोअर परळ भागातील हॉटेलला आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ही घटना घडल्याने पुन्हा एकदा अग्निशमन यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.घोडेले यांनी शहराचा आढावा घेतला असता धक्कादायक चित्र समोर आले. महापालिकेकडे ९० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त आहेत. त्यातील अवघ्या आठ ते दहा इमारतींनाच एनओसी देण्यात आली आहे. उर्वरित इमारतधारकांनी अग्निशमन यंत्रणेच्या कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे अर्ज तसेच पडून आहेत. मनपाच्या अग्निशमन यंत्रणेकडे आग लागलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे आणि पाणी मारणे एवढे एकमेव काम सुरू आहे. अग्निशमन विभागाला याशिवायही अनेक जबाबदाºया पार पाडाव्या लागतात, याचा विसर पडला आहे.तपासणीचे आदेशच्शहरातील सर्व मोठ्या हॉटेल, इमारती, मॉल आदी ठिकाणी युद्धपातळीवर तपासणी करण्यात यावी, असे आदेश महापौर घोडेले यांनी दिले. शनिवारी सायंकाळपासूनच अग्निशमन विभागाचे प्रमुख आर. के. सुरे व त्यांच्या कर्मचाºयांनी तपासणीला सुरुवात केली. सोमवारपर्यंत सर्व तपासणी करून अहवाल देण्याचे आश्वासनही सुरेयांनी दिले.