शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

अग्निशमन विभाग रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:18 IST

शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत एका हॉटेलला आग लागल्याने तब्बल १४ जणांना मृत्यू झाला. या घटनेने राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, मोठ्या शहरांमध्ये मॉल, चित्रपटगृह, हॉटेल, मोठ्या इमारतींमधील आग प्रतिबंधक यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी कारभार आलबेल असल्याचे चित्र समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत एका हॉटेलला आग लागल्याने तब्बल १४ जणांना मृत्यू झाला. या घटनेने राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, मोठ्या शहरांमध्ये मॉल, चित्रपटगृह, हॉटेल, मोठ्या इमारतींमधील आग प्रतिबंधक यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी कारभार आलबेल असल्याचे चित्र समोर आले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे निदर्शनास आले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने सर्वत्र तपासणीचे आदेश दिले.शहरात १६ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या शेकडो इमारती मागील काही वर्षांमध्ये तयार झाल्या आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा आवश्यक आहे. दरवर्षी अग्निशमन यंत्रणेची तपासणी करून नाहरकत प्रमाणपत्र मनपाकडून घेणे आवश्यक आहे. दवाखाने, मॉल, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी अग्निशमन यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. शहरातील ९० टक्के इमारतींमध्ये ही यंत्रणाच नाही. महापालिकेनेही कधी या इमारतींचे आॅडिट केलेले नाही. मुंबईच्या लोअर परळ भागातील हॉटेलला आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ही घटना घडल्याने पुन्हा एकदा अग्निशमन यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.घोडेले यांनी शहराचा आढावा घेतला असता धक्कादायक चित्र समोर आले. महापालिकेकडे ९० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त आहेत. त्यातील अवघ्या आठ ते दहा इमारतींनाच एनओसी देण्यात आली आहे. उर्वरित इमारतधारकांनी अग्निशमन यंत्रणेच्या कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे अर्ज तसेच पडून आहेत. मनपाच्या अग्निशमन यंत्रणेकडे आग लागलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे आणि पाणी मारणे एवढे एकमेव काम सुरू आहे. अग्निशमन विभागाला याशिवायही अनेक जबाबदाºया पार पाडाव्या लागतात, याचा विसर पडला आहे.तपासणीचे आदेशच्शहरातील सर्व मोठ्या हॉटेल, इमारती, मॉल आदी ठिकाणी युद्धपातळीवर तपासणी करण्यात यावी, असे आदेश महापौर घोडेले यांनी दिले. शनिवारी सायंकाळपासूनच अग्निशमन विभागाचे प्रमुख आर. के. सुरे व त्यांच्या कर्मचाºयांनी तपासणीला सुरुवात केली. सोमवारपर्यंत सर्व तपासणी करून अहवाल देण्याचे आश्वासनही सुरेयांनी दिले.