शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

घराला आग लागून सहा लाखाचे साहित्य खाक

By admin | Updated: May 29, 2017 00:28 IST

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील चिवरी शिवारातील शेतातील एका घराला २७ मे रोजी रात्री अचानक आग लागली़

लोकमत न्यूज नेटवर्कअणदूर : तुळजापूर तालुक्यातील चिवरी शिवारातील शेतातील एका घराला २७ मे रोजी रात्री अचानक आग लागली़ या आगीत संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम, सोन्याचे दागिने व इतर संसारोपयोगी साहित्य असे सहा लाखाचे साहित्य जळून खाक झाले़अणदूर येथील चंद्रकांत शिवलिंग राजमाने हे चिवरी शिवारातील शिवराज कुताडे यांच्या शेतात राहतात़ राजमाने कुटुंबिय २७ मे रोजी रात्री उकाड्यामुळे घराबाहेर झोपले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली़ कच्चे बांधकाम असलेल्या घराला गालेली आग वाऱ्यामुळे जास्तच पसरली़ लागलेली आग विझविण्यासाठी गेलेले विकास चंद्रकांत राजमाने (वय २४) हे २० टक्के भाजले आहेत़ त्यांना १०८ च्या रूग्णवाहिकेतून उपचारासाठी नेण्यात आले़ या आगीमध्ये दोन शेळ्या, बोक बोकडं सापडले असून, तेही भाजलेल्या अवस्थेत जिवंत आहेत़ ही आग आटोक्यात आणण्यासाठी युवराज मुळे यांचे पाण्याचे टँकर आणून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत राजमारे यांच्या घरावरील ४० पत्रे, १४ दंट्टे, तीन मोठी कवाडे, ८ पोती ज्वारी, ५ पोती गहू, ६ पोती मका, ५ पोती भुईमूग, २ पोती हरभरा, २ पोती तूर, १ पोते मूग, १ पोते पेंड, २ पोती भुसा, ५ पोती युरिया, १८ पोती डीएपी, रोख रक्कम ३५ हजार रुपये, संसारोपयोगी साहित्य, शेतातील महत्त्वाचे अवजारे, मोटार, पाईप असे जवळपास सहा लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले़ राजमाने कुटुंबियांच्या घरातील सदस्यांच्या अंगावरील कपडे वगळता एकही वस्तू आगीपासून शिल्लक राहिली नाही. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला असून, प्रशासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे़दरम्यान, आग विझविण्यासाठी केदार आलुरे व राम कोरे यांनी नळदुर्ग येथील अग्निशामक दलाला संपर्क साधला होता़ मात्र, गाडीमध्ये पाणी नाही म्हणून गाडी येवू शकत नाही असे उत्तर मिळाले़ त्यानंतर महावितरण कार्यालयात फोन करून १० ते १५ मिनिटे लाईट सुरू करा, आम्ही पाणी भरून घेऊन आग आटोक्यात आणू, अशी विनंती करण्यात आली होती़ मात्र, तरीही वीज सुरू करण्यात आली नाही़ नळदुर्ग येथील अग्निशमन दलाची गाडी किंवा महावितरणने रात्री वीजपुरवठा सुरू केला असता तर राजमाने यांच्या घरातील काहीतरी साहित्य वाचविण्यात यश आले असते, अशी प्रतिक्रीया घटनास्थळी उपस्थित नागरिक देत आहेत़ तर घटनेनंतर अणदूर सज्जाचे तलाठी दत्तात्रय बोंदर यांच्याशी संपर्क साधला असता, सकाळी पंचनामा करू, असे त्यांनी सांगितले़ मात्र, ते घटनास्थळी आलेच नाहीत. तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठीही घटनास्थळाकडे फिरकले नाहीत़ अणदूर येथील तलाठी कार्यालयातील सेवक गुंडू रजपूत यांनी घटनेचा पंचनामा केला़