अशोक कारके, औरंगाबाद महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारे महिला व बालविकास कार्यालय गरजूंना सापडता सापडत नाही. महिला व बालविकास कार्यालयामार्फत राबविण्यात येणार्या शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतून शेतकर्यांच्या मुलींच्या विवाहासाठी दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. या योजनेसाठी विभागाला २०१३-१४ वर्षात १०० जोडप्यांचे लक्ष्य दिले गेले होते. प्रत्यक्षात केवळ २७ जोडपीच या अनुदानाचा लाभ घेऊ शकली. त्यांना २ लाख ७० हजार रुपये अनुदान देण्यात आले. सामूहिक विवाह लावणार्या संस्थांना जोडप्यामागे दोन हजार रुपये दिले जातात. त्यानुसार ५४ हजार रुपये देण्यात आले आहेत. ८ लाख ७६ हजार रुपये लाभार्थी न मिळाल्याने पडून आहेत.
महिला व बालविकास कार्यालय शोधून सापडेना
By admin | Updated: May 24, 2014 02:05 IST