शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

कारखान्यासाठी बहीण-भावाची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: March 26, 2015 00:57 IST

संजय खाकरे , परळी विक्रमी ऊस गाळपामुळे नावाजल्या गेलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर सत्ता गाजविण्यासाठी बहीण-भावांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे

संजय खाकरे , परळीविक्रमी ऊस गाळपामुळे नावाजल्या गेलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर सत्ता गाजविण्यासाठी बहीण-भावांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सत्ता राखण्याचे आव्हान पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यापुढे आहे तर अस्तित्व सिद्ध करण्याचे कसब विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दाखवावे लागणार आहे.स्व. गोपीनाथ मुंडे यांनी युती सरकारच्या काळात वैद्यनाथ साखर कारखान्याची उभारणी केली. १६ वर्षांपासून कारखान्यावर मुंडे यांचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. त्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होत असलेली संचालक मंडळाची निवडणूक गाजू लागली आहे. २१ संचालक पदांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी जेष्ठ संचालक पंडितराव मुंडे व कार्यकारी संचालक डी. डी. कुलकर्णी यांच्यात ठिणगी पडली. त्याचे रूपांतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात झाले. त्यामुळे ही निवडणूक अधिकच संवेदनशील बनली आहे.दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत वैद्यनाथ कारखान्यावरील निर्विवाद वर्चस्वाला धक्का पोहचू नये यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह खासदार डॉ. प्रीतम मुंडे, अ‍ॅड. यशश्री मुंडे यांनी व्यूहरचना आखली आहे. दुसरीकडे जेष्ठ संचालक पंडितराव मुंडे यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विद्यमान संचालक मंडळाला हादरा देण्यासाठी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे स्वतंत्र पॅनल आखाड्यात उतरविण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास निवडणुकीत आणखीच रंग भरणार आहेत.तथापि, पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे कारखाना निवडणुकीत आमनेसामने आल्यामुळे तिसऱ्या पॅनलची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मुंडे विरूध्द मुंडे अशा सरळ लढतीची चिन्हे आहेत. जोरदार चुरसवैद्यनाथ कारखान्यावर स्व. गोपीनाथ मुंडे यांचा एकछत्री अंमल राहिलेला आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी कारखान्यातील राजकारण जवळून अनुभवलेले आहे. इकडे जेष्ठ संचालक पंडितराव मुंडे यांनी एकेकाळी कारखान्यावर हुकूमत गाजवलेली आहे. ते कधी महत्त्वाच्या पदावर नव्हते परंतु कारखाना प्रशासनावर वचक होता. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.२१ संचालकांच्या निवडणुकीत ८ हजार ४१२ इतके मतदार मतदान करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २७ मार्च आहे. ३० मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून, १ ते १५ एप्रिल दरम्यान अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल.तीन दिवसांत १६६ अर्जांची विक्री४बुधवारी संचालक पदाच्या निवडणुकीसाठी एकाच दिवशी ९६ अर्जांची विक्री झाली. तीन दिवसांत आतापर्यंत १६६ अर्ज विक्री झाले आहेत. केवळ पंडितराव मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे