शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

लाडसावंगी ग्रामपंचायतीचे आर्थिक गणित बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:05 IST

लाडसावंगी : गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम केला आहे. यात लाडसावंगी ग्रामपंचायतदेखील सुटली नाही. ...

लाडसावंगी : गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम केला आहे. यात लाडसावंगी ग्रामपंचायतदेखील सुटली नाही. कोरोनाच्या सावटाने अनेकांच्या नोकऱ्या, कामधंदे हिसकावले गेल्याने नागरिक ग्रामपंचायतीला कर देण्यास असक्षम आहेत. परिणामी करवसुली थांबल्याने ग्रामपंचायतीचा कारभार अडचणीत आला आहे. ‘आमदनी अठण्णी, खर्चा रुपय्या’ अशी म्हणण्याची वेळ ग्रामपंचायतीवर येऊन ठेपली आहे, तर नवीन विकासकामांनादेखील ब्रेक लागला आहे.

औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी हे गाव वीस हजार लोकवस्तीचे आहे. सतरा सदस्य असलेल्या येथील ग्रामपंचायतीला गेल्या १४ महिन्यांपासून कोरोना महामारीचा सामना करावा लागत आहे. गावात भरणारी बाजारपेठ बंद झाली आहे. शेती हंगामातील खरेदी-विक्री बंद झाल्याने आर्थिक व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक करातून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने ग्रामपंचायतीची वाईट अवस्था झाली आहे. वसुली नाही, तर कर्मचाऱ्यांना पगारदेखील नाही.

गावाला तीन विहिरींतून पाणीपुरवठा केला जातो. यात गावातील व बाबूवाडी धरणाखालील पाइपलाइन सतत नादुरुस्त होते. तीन विहिरींचा विद्युतपंपाचा खर्च आवाक्याबाहेर गेला. नागरिकांना उत्पन्न नसल्याने कोणीही कर भरणा करीत नाही. त्यात ग्रामपंचायतीत दहा कर्मचारी कामाला आहेत. त्यांचा पगार थकला आहे. आठवडी बाजार बंद असल्याने वर्षाकाठी पाच लाखांचा बाजारातून मिळणारा करदेखील बंद झाला आहे, तर तेराव्या व चौदाव्या वित्त आयोगाचा पैसा केवळ नवीन कामांसाठीच खर्च करता येतो. ग्रामपंचायतीसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

कोट

लाडसावंगी गाव मोठे असल्याने पाइपलाइन दुरुस्ती, विद्युत पंप दुरुस्ती उधारीवर करून गावाचा पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. करातून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा असा प्रश्न आहे.

-सुदाम पवार, सरपंच, लाडसावंगी

गावकरी पाणीपट्टी, घरपट्टी देण्यासाठी तयार होत नाहीत. करवसुलीला पथक गेले तर हाताला काम नाही, मग पैसा द्यायचा तरी कोठून, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पैसे आल्यावर नक्की भरू, असे आश्वासन गावकरी देत आहेत.

- बी. एस. मुकाडे, ग्रामविकास अधिकारी.