शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

अखेर रामलीला मैदानावरील अतिक्रमण हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 16:56 IST

महसूल विभाग व नगरपालिकेच्या वतीने सकाळी सात वाजेपासूनच अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली.

ऑनलाईन लोकमत
 
हिंगोली : रामलीला मैदानावरील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण स्वत:हून  काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र; यास न जुमानत अतिक्रमण जैसे थे होते. यामुळे आज महसूल विभाग व नगरपालिकेच्या वतीने सकाळी सात वाजेपासूनच अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. 
 
पालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी ४ जुलै हि तारीख निश्चित करण्यात आली होती.  परंतु; या दिवशी आषाढी एकादशी असल्याने संपूर्ण पोलीस बंदोबस्त नर्सी येथे होता. यामुळे या हि मोहीम तेव्हा रद्द झाली होती. ती  काढण्यात येणाºया अतिक्रमणाची अजूनही तारीखी निश्चित झालेली नसली तरी महसूल विभागाने मात्र शनिवारी अगदी सकाळी सात वाजेपासूनच अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांना पळता भुई थोडी झाली होती.
 
पोलीस बंदोबस्त असल्याने अतिक्रमणधारक आपलेच दुकान असल्याचे सांगण्यासही घाबरत होते. अतिक्रमण मोहीम सुरु असतानााच काही अतिक्रमणधारक धाडस करुन दुकानातील साहित्य इतरत्र हलविण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. आॅटो, टेम्पो, हातगाडा, बैलगाडी अशा मिळेल त्या वाहनाचा आधार घेत जिवाच्या आकांताने त्यांची खटाटोप सुरू होती. तर दुसरीकडे जसजसा जेसीबी जवळ येत होता, तशी काळजात धडकी भरत होती.
 
यात अनेकांनी केवळ महागड्या वस्तू वाचविण्याचा प्रयत्न केला. जेसीबीसमोर जे दुकान येईल, त्याचा संपूर्ण नायनाट केला जात होता. अनेक खोके तर जागीच दाबले. पत्र्याचे शेड पाडले. लोखंडी पक्के शेडही यात धाराशाही पडले.  अतिक्रमणावर जेसीबी फिरविल्यानंतर नागरिक बोंब ठोकत होते. मात्र पोलीस सतर्क व तगड्या संख्येत असल्याने काहीच तरणोपाय नव्हता. काहीजण तर बस्तान हलविताना पडून जखमीही झाले. तसेच या ठिकाणी मोठा जमाव जमला होता.
 
सकाळी सात वाजता सुरु झालेली अतिक्रमण मोहीम दुपारी १ च्या सुमारास शांत झाली होती. नेहमीच गर्दी असलेल्या  रामलीला मैदानावरील दुकाने हटविल्याने, मोकळे मैदान तयार झाले. मात्र जेसीबीच्या साह्याने नुकसान झालेल्या दुकानाचे साहित्य सायंकाळपर्यंत अतिक्रमणधारक गोळा करीत होते. तर काही आहे त्या आवस्थेत सोडून आपले साहित्य नेण्यासाठी धावपळ करीत होते.  
 
सगळीकडे टप-या नेणारी वाहने
अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असताना शहरातील सर्वच रस्त्यांवर टप-या  वाहून नेणारीच वाहने, हातगाडे दिसत होते. आता यापुढे व्यवसाय कसा व कुठे करायचा, या चिंतेत हे ओझे वाहून नेत ही मंडळी डोळ्यातून अश्रुही ढाळत होती. मात्र; अतिक्रमण करूनच बस्तान असल्याने कैफियत तरी मांडायची कुठे? हाही प्रश्नच होता.