शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

अखेर संचिकांवरील धूळ झटकली

By admin | Updated: December 24, 2016 22:00 IST

उस्मानाबाद : वैद्यकीय बिले दाखल करूनही जिल्हा रूग्णालयाकडून आठ ते नऊ महिने लोटून तांत्रिक मान्यता मिळत नव्हती.

उस्मानाबाद : वैद्यकीय बिले दाखल करूनही जिल्हा रूग्णालयाकडून आठ ते नऊ महिने लोटून तांत्रिक मान्यता मिळत नव्हती. सुमारे सहाशेवर प्रस्ताव प्रलंबित होते. त्यामुळे विविध कर्मचारी संघटनांनी आक्रम भूमिका घेतली होती. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर संबंधित लिपिकाचा टेबल बदलण्यात आला. त्यानंतर कुठे प्रक्रियेला गती आली मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या श्ांभरावर संचिका निकाली काढण्यात आल्या आहेत. पूर्वी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावरूनच वैद्यकीय बिलांची प्रतीपूर्ती केली जात असे. परंतु, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी सदरील बिलांची तांत्रिक पडताळणी करण्याची जबाबदारी जिल्हा रूग्णालयाकडे सोपविली. कर्मचाऱ्यांना वेळेत बिले मिळावीत, हा यामागाचा उद्देश. परंतु, याच उद्देशाला मागील काही महिने हारताळ फासण्याचे काम झाले. एकेका कर्मचाऱ्याची संचिका दहा-ते बारा महिन्यांपासून संबंधित कक्षात धुळखात पडून रहात होती. वारंवार पाठपुरवा करूनही वैद्यकीय बिलांच्या संचिका निकाली निघत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आंदोलनाची भूमिका घेतली होती. स्वत: कर्मचाऱ्यांनी खेटे मारल्याशिवाय जिल्हा रूग्णालयाकडून संचिकेला तांत्रिक मान्यता मिळत नाही, असा या संघटनेचा आरोप होता. दरम्यान, ‘वैद्यकीय बिलाचे सहाशेवर प्रस्ताव प्रलंबित’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. प्राथमिक चौकशीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक एकनाथ माले यांनी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांच्या माथी खापर फोडले होते. बहुतांश प्रलंबित प्रकरणे ही तत्कालीन ‘सीएस’ डॉ. धाकतोडे, डॉ. चव्हाण आणि डॉ. बाबरे यांच्या कार्यकाळातील असल्याचे त्यांनी संघटनेला दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले होते. तसेच प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याचा ठपका ठेवित संबंधित टेबल प्रमुखाची उचलबांगडीही करण्यात आली. यानंतर कुठे संचिका निकाली काढण्याची प्रक्रिया गतीमान झाली. परिणामी मागील काही दिवसांत शिक्षकांच्या जवळपास शंभरावर संचिका निकाली निघाल्या आहेत. परिणामी मागील अनेक महिन्यांपासून वैद्यकीय बिलांच्या प्रतिक्षेत असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शिक्षकांसोबतच अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलेही प्रलंबित आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांच्या संचिकाही तातडीने निकाली काढाव्यात, अशी मागणी आता होवू लागली आहे. (प्रतिनिधी)