शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बैलांसोबत भरतो ट्रॅक्टरचा पोळा

By admin | Updated: August 24, 2014 23:54 IST

मदन बियाणी, कनेरगाव नाका शेतकऱ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्व असलेला पोळा सण कनेरगाव नाका येथे वेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे.

मदन बियाणी,  कनेरगाव नाकाशेतकऱ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्व असलेला पोळा सण कनेरगाव नाका येथे वेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे. बळीराजा वर्षभर रावून ज्या बैलांच्या भरोशावर शेती करतो. त्या बैलांप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सण साजरा करीत असताना आज बदलत्या काळात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली असून येथे बैलांसोबत ट्रॅक्टरचा पोळा दरवर्षी भरविल्या जात आहे. या आगळ्या वेगळ्या पोळ्याला उपस्थित राहण्यासाठी लांबून अनेकजण दरवर्षी येत असल्याने हा पोळा कुतूहलाचा विषय बनला आहे.माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आज बैलांचे श्रम मागे पडले असून त्यांची जागा यांत्रिकीकरणाने घेतली आहे. शेतीमध्ये नांगरणी, वखरणी, पेरणी आदी कामांसाठी बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर ग्रामीण भागात वाढला आहे. सुखी जीवनमान बनविण्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची साथ मिळाल्याने मागील १४ वर्षापुर्वी कै. शरद केशवराव जोशी यांनी ट्रॅक्टर्सचा पोळा भरविण्याची संकल्पना मांडली. तेव्हा एकुण ट्रॅक्टर या पोळ्यामध्ये बैलांसारखे सजवून सहभागी केले. आजमितीला तीस ते पस्तीस ट्रॅक्टर्स त्यामध्ये सहभागी होतात. हा पोळा भरविण्यासाठी शिरीष जोशी, सरपंच डॉ. संतोष गावंडे, रामचंद्र पाटील, नवनाथ गावंडे, बाळू पाटील, गजानन गावंडे, किसन गावंडे आदी परिश्रम घेत असतात. बालाजी गलंडे, महादजी डोळसकर, संदीप गावंडे, गोपाल काळदाते, केशव गावंडे, माधव गावंडे, चंद्रकांत गावंडे, सुरेश बर्वे, विलास बिडवे, विष्णू बाचणवार, राजगुरू, पंढरी वानखेडे, विलासराव गावंडे, बालाजी गावंडे आदी पुढाकार घेत आहेत. पोळ्याच्या दिवशी या ट्रॅक्टसची गावातून मानकऱ्यांच्या हस्ते पुजा झाल्यानंतर मिरवणूक काढली जाते. पोळा संपल्यानंतर घरोघरी बैलाप्रमाणे या ट्रॅक्टरची पुजा केली जाते.