शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

पैसे भरुनही वीज जोडणी मिळेना

By admin | Updated: May 19, 2017 00:18 IST

उस्मानाबाद :एप्रिल-२०१७ अखेर जिल्ह्यातील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : अत्याधुनिक साधने तसेच ठिबकचा वाढलेला वापर यामुळे कृषी पंप वीज जोडणीची विद्युत वितरण कंपनीकडे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेत वीज जोडणी मिळत नसल्याने एप्रिल-२०१७ अखेर जिल्ह्यातील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. मागील काही वर्षात शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल आहे. आधुनिक शेतीमुळे नवनव्या अवजारांचा वापर शेतीमध्ये आवर्जून केला जात आहे. त्याचे थेट फायदेही शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र अशा पद्धतीच्या शेतीसाठी शेतशिवारामध्ये वीज असणे आवश्यक असते. विशेषत: मुबलक पाणी असतानाही केवळ कृषी पंपाची वीज जोडणी झालेली नसल्याने अनेकांना शेतीला पाणी देता येत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सन २०१४ पासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणीची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये जिल्ह्यातील ५३९ शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी पैसे भरूनही त्यांना जोडणी मिळालेली नव्हती. २०१४-१५ मध्ये ही संख्या ८४ इतकी होती, तर २०१५-१६ मध्ये या संख्येत अनेक पटीने वाढ झाल्याचे दिसून येते. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात १०३८ शेतकरी वीज जोडणीसाठी पैसे भरूनही विजेची प्रतीक्षा करीत असल्याचे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या आकडेवारीवरून दिसून येते. ही संख्या २०१६-१७ मध्ये आणखी दुपटीने वाढली. या वर्षात पैसे भरूनही वीज जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २५४० एवढी पोहोचली. चालू वर्षी मात्र कृषी पंप वीज जोडणीकडे विद्युत वितरण कंपनीने काहीसे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसते. एप्रिल अखेरपर्यंत २०१७-१८ मध्ये पैसे भरूनही १३६ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज जोडणी मिळालेली नाही. याबाबत राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मंडल कार्यालयाशी संपर्क साधला असता, सन २०१४-१५ व मार्च २०१४ पूर्वी पैसे भरूनही काहींना कृषी पंप वीज जोडणी मिळालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी पंप वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या काही ग्राहक त्यांनी दिलेल्या पत्त्यावर सापडत नाहीत, तर काही ग्राहकांनी वीज जोडणीची आवश्यकता नसतानाही अर्ज केल्याचे दिसून येते, तर काही ठिकाणी वीज जोडणीसाठी खांब उभे करण्यासाठी गेल्यानंतर स्थानिक लोकांकडून हरकती घेतल्या गेल्याने सदर ग्राहकांना वीज जोडणी देता आली नसल्याचे सांगण्यात आले.