शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

पैसे भरुनही वीज जोडणी मिळेना

By admin | Updated: May 19, 2017 00:18 IST

उस्मानाबाद :एप्रिल-२०१७ अखेर जिल्ह्यातील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : अत्याधुनिक साधने तसेच ठिबकचा वाढलेला वापर यामुळे कृषी पंप वीज जोडणीची विद्युत वितरण कंपनीकडे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेत वीज जोडणी मिळत नसल्याने एप्रिल-२०१७ अखेर जिल्ह्यातील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. मागील काही वर्षात शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल आहे. आधुनिक शेतीमुळे नवनव्या अवजारांचा वापर शेतीमध्ये आवर्जून केला जात आहे. त्याचे थेट फायदेही शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र अशा पद्धतीच्या शेतीसाठी शेतशिवारामध्ये वीज असणे आवश्यक असते. विशेषत: मुबलक पाणी असतानाही केवळ कृषी पंपाची वीज जोडणी झालेली नसल्याने अनेकांना शेतीला पाणी देता येत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सन २०१४ पासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणीची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये जिल्ह्यातील ५३९ शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी पैसे भरूनही त्यांना जोडणी मिळालेली नव्हती. २०१४-१५ मध्ये ही संख्या ८४ इतकी होती, तर २०१५-१६ मध्ये या संख्येत अनेक पटीने वाढ झाल्याचे दिसून येते. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात १०३८ शेतकरी वीज जोडणीसाठी पैसे भरूनही विजेची प्रतीक्षा करीत असल्याचे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या आकडेवारीवरून दिसून येते. ही संख्या २०१६-१७ मध्ये आणखी दुपटीने वाढली. या वर्षात पैसे भरूनही वीज जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २५४० एवढी पोहोचली. चालू वर्षी मात्र कृषी पंप वीज जोडणीकडे विद्युत वितरण कंपनीने काहीसे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसते. एप्रिल अखेरपर्यंत २०१७-१८ मध्ये पैसे भरूनही १३६ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज जोडणी मिळालेली नाही. याबाबत राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मंडल कार्यालयाशी संपर्क साधला असता, सन २०१४-१५ व मार्च २०१४ पूर्वी पैसे भरूनही काहींना कृषी पंप वीज जोडणी मिळालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी पंप वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या काही ग्राहक त्यांनी दिलेल्या पत्त्यावर सापडत नाहीत, तर काही ग्राहकांनी वीज जोडणीची आवश्यकता नसतानाही अर्ज केल्याचे दिसून येते, तर काही ठिकाणी वीज जोडणीसाठी खांब उभे करण्यासाठी गेल्यानंतर स्थानिक लोकांकडून हरकती घेतल्या गेल्याने सदर ग्राहकांना वीज जोडणी देता आली नसल्याचे सांगण्यात आले.