शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

‘मुद्रांक’ बुडविणार्‍या ३२०० जणांवर होणार गुन्हे दाखल

By admin | Updated: May 30, 2014 01:03 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद लाखो रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी तब्बल ३२०० जणांवर कारवाई करण्यास जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी हिरवा कंदिल दाखविला आहे.

 सुनील कच्छवे, औरंगाबाद शेतीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना जलसंपदा विभागाचे बोगस प्रमाणपत्र जोडून लाखो रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी तब्बल ३२०० जणांवर कारवाई करण्यास जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी हिरवा कंदिल दाखविला आहे. या सर्वांवर ३० मे रोजी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातील. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एवढ्या व्यक्तींवर एकाच वेळी गुन्हे दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. वैजापूर तालुक्यात २००६-११ या काळात हे सर्व व्यवहार नोंदविले गेलेले आहेत. यामध्ये शेतकर्‍यांनी आपल्या शेतीला सिंचन प्रकल्पांचा लाभ होत नसल्याचे बोगस प्रमाणपत्र जोडून शासनाचे मुद्रांक शुल्क मोठ्या प्रमाणावर बुडविले आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने त्याची सविस्तर चौकशी केली. चौकशीत तब्बल ८०० व्यवहारांमध्ये नोंदणी करताना हे बोगस प्रमाणपत्र जोडल्याचे समोर आले. महानिरीक्षकांच्या सूचनांनुसार सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वाय. डी. डामसे यांनी कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याकडे पाठविला होता. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बरेच दिवस हा प्रस्ताव पडून होता. जिल्हाधिकार्‍यांनी २८ मे रोजी त्यावर स्वाक्षरी केली. त्यानंतर सहजिल्हा निबंधक डामसे यांनी लगेचच वैजापूर येथील दुय्यम निबंधक आर. सी. कराळे यांना संबंधित ८०० प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. यामध्ये खरेदी करणारा, विकणारा तसेच प्रत्येक प्रकरणातील दोन साक्षीदार, असे एकूण ३२०० जणांवर गुन्हे दाखल होतील. शुक्रवारी या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे डामसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणारी जमीन बागायती समजली जाते. मात्र, बर्‍याच वेळा लाभक्षेत्रात असूनही काही जमिनींना प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. अशा प्रकरणात जलसंपदा विभागाने तसे प्रमाणपत्र दिल्यास संबंधित जमिनीला कोरडवाहू गृहीत धरले जाते. खरेदी-विक्रीचा व्यवहार नोंदविताना असे प्रमाणपत्र असेल तर मुद्रांक शुल्कही कमी भरावे लागते. ही बाब हेरून वैजापूर तालुक्यात अनेकांनी स्वत:च बोगस प्रमाणपत्र बनवून त्याआधारे जमिनींचे व्यवहार केले आहेत. बुडीत मुद्रांक शुल्काची वसुलीही होणार फसवणूक प्रकरणात संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत; पण त्यासोबतच बुडीत मुद्रांक शुल्काची वसुलीही होणार आहे. आठशे प्रकरणांमध्ये शासनाचा जवळपास पन्नास ते साठ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. गुन्हे दाखल करण्याची कारवाई फसवणुकीमुळे होत आहे. बुडविलेले मुद्रांक शुल्क संबंधितांना भरावेच लागणार आहे. त्यासाठी लवकरच सर्व प्रकरणात संबंधित व्यक्तींना बुडीत शुल्काचा भरणा करण्यासंदर्भात नोटीस पाठविण्यात येणार असल्याचे सहजिल्हा निबंधक वाय. डी. डामसे यांनी सांगितले.