शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

फेरविचार याचिका दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:52 IST

नागरिकांच्या वतीने लवकरच न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील शासकीय गायरान व महार हाडोळा जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. यामुळे अतिक्रमणधारकांत भितीचे सावट पसरले असून, या संदर्भात नागरिकांच्या वतीने लवकरच न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रांजणगावातील शासकीय गट क्रमांक २, ५५,७५, ७६, ७७,७८, ७९, ८२, ८३ व ८४ मधील गायरान व महार हातोळा जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी शेख सिकंदर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिले. यासाठी ग्रामपंचायतीला पोलीस संरक्षण पुरविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात लवकरच अतिक्रमणधारकांना नोटिसाही बजावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायतीमार्फत नागरी सुविधा पुरविण्यात येतात. यापोटी ग्रामपंचायत अतिक्रमणधारकांकडून कराची वसुलीही करीत आहे. आता न्यायालयाने अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश दिल्याने अतिक्रमणधारकांत भितीचे सावट पसरले आहे.

या प्रकरणी लवकरच नागरिकांच्यावतीने उच्च न्यायालयात फेर-विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी २९ मार्च रोजी रांजणगावातील देवगिरी कॉलनीत सायंकाळी ७ वाजता बैठक घेण्यात येत आहे. यात विविध विषयांवर चर्चा केली जाणार असून, बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन कैलास हिवाळे, रावसाहेब भोसले, भगवान साळुंके, जावेद शेख आदींनी केले आहे.--------------------------

टॅग्स :Walujवाळूज