शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

कर्जबुडव्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

By admin | Updated: July 19, 2014 01:21 IST

औरंगाबाद : ‘बँकेचा पैसा जनतेच्या भल्यासाठी, नाही कोणाच्या लुटीसाठी,’ अशा घोषणा देत देशातील बड्या कर्जबुडव्यांविरोधात आज बँक कर्मचाऱ्यांनी आवाज बुलंद केला.

औरंगाबाद : ‘बँकेचा पैसा जनतेच्या भल्यासाठी, नाही कोणाच्या लुटीसाठी,’ अशा घोषणा देत देशातील बड्या कर्जबुडव्यांविरोधात आज बँक कर्मचाऱ्यांनी आवाज बुलंद केला. जाणीवपूर्वक बडी कर्ज थकविणाऱ्या कर्जदारांना फौजदारी गुन्हा लागू करा, सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण करू नका, या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा बँक कर्मचारी असोसिएशनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. बँक राष्ट्रीयीकरणाच्या ४५ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अशा प्रकारची निदर्शने करण्यात आली. सिडकोतील स्टेट बँक आॅफ हैदराबाद बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर सायंकाळी ५ वाजता निदर्शने करण्यासाठी बँक कर्मचारी जमा झाले होते. याचे नेतृत्व असोसिएशनचे अध्यक्ष देवीदास तुळजापूरकर यांनी केले.नवीन भाजपा सरकारही सार्वजनिक बँकविरोधी असून या सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण करण्याचा त्यांचा मनसुबा अर्थसंकल्पातून व्यक्त झाला आहे. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमुळेच भारतातील आर्थिकव्यवस्था टिकून राहिली, हे त्यांनी यावेळी निर्दशात आणून दिले. इन्कम टॅक्स बुडविणाऱ्यांची यादी जाहीर केली जाते, त्याच धर्तीवर बँकेचे कर्ज बुडविणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात यावी, बड्या कॉर्पोरेट उद्योगपतींना नवीन बँकांचे परवाने देऊ नका. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण ग्राहक विरोधी आहे. स्टेट बँकांच्या सहयोगी ५ बँकांच्या कायद्यातून मुक्त करा, आदी मागण्यांची माहिती रवी धामणगावकर यांनी दिली. निदर्शनात बी.एन. देशमुख, सुनीता गणोरकर, बबन खर्डेकर, सतीश देशपांडे, अजय पाटील, राकेश बुरबुरे, कुमुदिनी देशमुख, जयश्री जोशी, सुहासिनी देशमुख यांच्यासह बँक कर्मचारी हजरहोते. गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षर करण्याचा निर्धारचीट फंड घोटाळा, केबीसी घोटाळा आदी घोटाळ्यांत सर्वसामान्य गुंतवणूकदाराची आर्थिक लूट होत आहे.गुंतवणूकदारांनी कुठे पैसा गुंतवावा, त्यांचा पैसा कुठे सुरक्षित राहील, याची माहिती देण्यासाठी गुंतवणूकदरांना आर्थिक साक्षर करण्याचा विडा बँक कर्मचाऱ्यांनी उचलला आहे. सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण रोखणे, बँकेचे कर्ज बुडवून जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे बडे उद्योजक या विरोधात लढ्यात जनतेला सहभागी करून घेण्यात येणार आहे. यासाठी सर्वप्रथम गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षर करण्यात येणार असल्याची घोषणा देवीदास तुळजापूरकर यांनी केली.?