शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

कर्जमाफीसाठी आमचा संघर्ष लढा

By admin | Updated: April 2, 2017 23:46 IST

औसा / उजनी : कर्जमाफी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रविवारी येथे केले.

औसा / उजनी : राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सरकारच्या विरोधातील आमचा हा संघर्ष लढा सुरूच राहणार आहे. कर्जमाफी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रविवारी येथे केले.शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरून काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा रविवारी सकाळी औसा तालुक्यात पोहोचली. बुधोडा, औसा मोड, बोरफळ, बेलकुुंड मार्गे ही संघर्ष यात्रा उजनी येथे पोहोचल्यानंतर तिथे जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. संघर्ष यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. त्रिंबक भिसे, आ. विक्रम काळे, आ. बसवराज पाटील, आ. सुनील केदार, आ. राहुल बोंद्रे, आ. जयकुमार गोरे, आ. विद्या चव्हाण, आ. मुस्तबानो खलिपे, आ. संग्राम थोपटे, आ. दीपक चव्हाण, आ. अहिरे, आ. नरहरी जिरवळ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, धीरज देशमुख, माजी आ. बाबासाहेब पाटील यांच्यासह लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपती काकडे, नगराध्यक्ष अफसर शेख, उपाध्यक्ष भरत सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी, संजय बनसोडे, रामदास चव्हाण, नारायण लोखंडे आदींची उपस्थिती होती. खा. अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या झालेल्या अवस्थेला वाचा फोडण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. विरोधी पक्ष शेतकऱ्यांसाठी आवाज उठवीत आहेत. पण हा आवाज कोंडण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सरकार असंवेदनशील आहे. खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून भाजपा निवडणुका जिंकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. १५ दिवसांपूर्वी या भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. त्याचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. मदत तर दूरच, असेही खा. अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले.