शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कर्जमाफीसाठी आमचा संघर्ष लढा

By admin | Updated: April 2, 2017 23:46 IST

औसा / उजनी : कर्जमाफी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रविवारी येथे केले.

औसा / उजनी : राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सरकारच्या विरोधातील आमचा हा संघर्ष लढा सुरूच राहणार आहे. कर्जमाफी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रविवारी येथे केले.शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरून काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा रविवारी सकाळी औसा तालुक्यात पोहोचली. बुधोडा, औसा मोड, बोरफळ, बेलकुुंड मार्गे ही संघर्ष यात्रा उजनी येथे पोहोचल्यानंतर तिथे जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. संघर्ष यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. त्रिंबक भिसे, आ. विक्रम काळे, आ. बसवराज पाटील, आ. सुनील केदार, आ. राहुल बोंद्रे, आ. जयकुमार गोरे, आ. विद्या चव्हाण, आ. मुस्तबानो खलिपे, आ. संग्राम थोपटे, आ. दीपक चव्हाण, आ. अहिरे, आ. नरहरी जिरवळ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, धीरज देशमुख, माजी आ. बाबासाहेब पाटील यांच्यासह लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपती काकडे, नगराध्यक्ष अफसर शेख, उपाध्यक्ष भरत सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी, संजय बनसोडे, रामदास चव्हाण, नारायण लोखंडे आदींची उपस्थिती होती. खा. अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या झालेल्या अवस्थेला वाचा फोडण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. विरोधी पक्ष शेतकऱ्यांसाठी आवाज उठवीत आहेत. पण हा आवाज कोंडण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सरकार असंवेदनशील आहे. खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून भाजपा निवडणुका जिंकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. १५ दिवसांपूर्वी या भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. त्याचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. मदत तर दूरच, असेही खा. अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले.