शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
3
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
4
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
5
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
6
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
7
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
8
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
9
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
10
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
11
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
12
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
13
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
14
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
15
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
16
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
17
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
18
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
19
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
20
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

कर्जमाफीसाठी आमचा संघर्ष लढा

By admin | Updated: April 2, 2017 23:46 IST

औसा / उजनी : कर्जमाफी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रविवारी येथे केले.

औसा / उजनी : राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सरकारच्या विरोधातील आमचा हा संघर्ष लढा सुरूच राहणार आहे. कर्जमाफी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रविवारी येथे केले.शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरून काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा रविवारी सकाळी औसा तालुक्यात पोहोचली. बुधोडा, औसा मोड, बोरफळ, बेलकुुंड मार्गे ही संघर्ष यात्रा उजनी येथे पोहोचल्यानंतर तिथे जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. संघर्ष यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. त्रिंबक भिसे, आ. विक्रम काळे, आ. बसवराज पाटील, आ. सुनील केदार, आ. राहुल बोंद्रे, आ. जयकुमार गोरे, आ. विद्या चव्हाण, आ. मुस्तबानो खलिपे, आ. संग्राम थोपटे, आ. दीपक चव्हाण, आ. अहिरे, आ. नरहरी जिरवळ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, धीरज देशमुख, माजी आ. बाबासाहेब पाटील यांच्यासह लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपती काकडे, नगराध्यक्ष अफसर शेख, उपाध्यक्ष भरत सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी, संजय बनसोडे, रामदास चव्हाण, नारायण लोखंडे आदींची उपस्थिती होती. खा. अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या झालेल्या अवस्थेला वाचा फोडण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. विरोधी पक्ष शेतकऱ्यांसाठी आवाज उठवीत आहेत. पण हा आवाज कोंडण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सरकार असंवेदनशील आहे. खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून भाजपा निवडणुका जिंकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. १५ दिवसांपूर्वी या भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. त्याचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. मदत तर दूरच, असेही खा. अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले.