शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरुद्ध लढा सुरूच; अवघ्या ३६५ दिवसांत ५६ हजार नागरिकांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 12:50 IST

One Year of corona virus in Aurangabad शहरात गतवर्षी १५ मार्च रोजीच एका खासगी रुग्णालयात पहिल्या कोरोनाच्या रुग्णाचे निदान झाले होते.

ठळक मुद्देकोरोना महामारीत तेराशेवर लोकांचे बळीडाॅक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांसह प्रशासनाकडून लढा सुरूच

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : तारीख १५ मार्च २०२०....औरंगाबादकर ही तारीख कधीही विसरू शकणार नाही. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ औरंगाबादेत याच दिवशी कोरोनाने शिरकाव केला. या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि आरोग्य यंत्रणा हादरून गेली. वर्षभराच्या ३६५ दिवसांत एक ते तब्बल ५६ हजार रुग्णांपर्यंत जिल्ह्याने मजल गाठली, तर तेराशेवर लोकांचा दुर्दैवाने बळी गेला. वर्षपूर्ती होत आहे, पण कोरोना महामारीचे संकट अजूनही दूर झालेले नाही. डाॅक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाचा दिवसरात्र प्रयत्नांची पराकाष्टा करून त्याविरुद्ध लढा सुरूच आहे.

शहरात गतवर्षी १५ मार्च रोजीच एका खासगी रुग्णालयात पहिल्या कोरोनाच्या रुग्णाचे निदान झाले होते. परदेशातून आलेल्या प्राध्यापक महिलेचा अहवाल या दिवशी पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा आरोग्य विभाग, मनपा प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कातील जवळपास ६०० लोकांची तपासणी केली, परंतु कोणीही कोरोनाबाधित आढळून आले नाही. हा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आणि आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, एप्रिल, २०२० पासून दररोज नवे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. त्यात अजूनही खंड पडलेला नाही. वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात सर्वसामान्य नागरिकांबरोबर काही आरोग्य कर्मचाऱ्यांचाही बळी गेला, पण आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता, रुग्णसेवेत आजही एक पाऊल पुढे आहेत.

आक्टोबर ते जानेवारीदरम्यान रुग्णसंख्या कमी राहिल्याने नागरिकांमधील कोरोनाची भीती काहीशी संपली, पण फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. प्रशासनाच्या मदतीने आराेग्य उपसंचालक डाॅ.स्वप्निल लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सुधाकर शेळके, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.नीता पाडळकर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या उपचारासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत.

घाटीत कोरोना तपासणीची सुविधाघाटीत २९ मार्च, २०२० रोजी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र कार्यान्वित झाले आणि शहरातच कोरोनाची तपासणीची सुविधा सुरू झाली. यासाठी अधिष्ठाता डाॅ.कानन येळीकर, सूक्ष्म जीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ.ज्योती बजाज-इरावणे यांनी परिश्रम घेतले. त्यापूर्वी रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील ‘एनआयव्ही’ला पाठवावे लागत होते. कोरोना तपासणीसह गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी घाटीतील डाॅक्टर्स, परिचारिका महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.

तब्बल १८० दिवस रोज मृत्यूजिल्ह्यात ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मराठवाड्यात कोरोनाचा हा पहिला बळी ठरला होता. त्यानंतर, १३ मेपासून कोरोनामुळे प्रत्येक दिवस घातवार ठरत गेला. या दिवसापासून जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत गेले. जिल्ह्यात तब्बल १८० दिवसांनंतर म्हणजे ६ महिन्यांनंतर कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्युसत्राला ८ नोव्हेंबर रोजी ब्रेक लागला. त्यानंतर, काही दिवस मृत्यूचे प्रमाण घटले, परंतु आता पुन्हा एकदा रोज मृत्यू होत आहे.

मास्कची साथ कधीही सोडली नाहीमी कोरोनाबाधित आढळले, पण सुदैवाने माझ्या संपर्कातील कोणीही बाधित आढळले नाही. मला माझ्या डाॅक्टर मुलाचा मोठा आधार मिळाला. कोरोनातून बरे झाल्यानंतर मी नियमित कामकाज सुरू केले. मास्क लावल्यावर अनेक सहकारी ‘मास्क का लावता, काही होत नाही’ म्हणून खिल्ली उडवत असत, पण मी कधीही मास्क वापरणे साेडले नाही. मी लसही घेतली आहे. आज वर्षभरानंतरही कोरोनाची तीच परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना अजूनही गांभीर्य कळले नाही, असे वाटते. नागिरकांनी पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे. जबाबदारी पार पडली पाहिजे.- डाॅ.मीना सिन्हा, शहरातील पहिल्या कोरोना रुग्ण

त्रिसूत्रीचे पालन करावेप्रारंभी उपचारासंदर्भात गाइडलाइन नव्हत्या. त्यावेळी आम्ही पहिल्या रुग्णावर उपचार केले. आजही रुग्ण वाढतच आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्स आणि वारंवार हात धुवणे या त्रिसूत्रीचे पालन करणे आजही महत्त्वपूर्ण आहे.- डाॅ.हिमांशू गुप्ता, प्रशासक, सेठ नंदलाल धूत हाॅस्पिटल

यशस्वी उपचारपहिला रुग्ण आढळला, त्यावेळी उपचारपद्धती स्पष्ट नव्हत्या. त्यामुळे थोडी भीती होती, पण रुग्णावर यशस्वी उपचार केले. त्यावेळी रुग्ण लवकर गंभीर होत असे. चालत येणारा रुग्ण गंभीर होत असे, परंतु आता तसे राहिलेले नाही.- डाॅ.वरुण गवळी, क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट, पहिल्या रुग्णावर उपचार करणारे डाॅक्टर

जिल्ह्यातील वर्षभरातील कोरोनाची परिस्थितीमहिना -             रुग्ण -             मृत्यूमार्च २०२० - १             -०एप्रिल २०२० - १७९             -७मे २०२० - १,३६४             -६६जून २०२० - ४,१२९             -१८५जुलै २०२० - ६,९००             -२१८ऑगस्ट २०२० - ११,१६२             -२१६सप्टेंबर २०२० - १०,९५९             -२४६ऑक्टोबर २०२० - ५,६६८             -१४४नोव्हेंबर २०२० - २,९९३             -६७डिसेंबर २०२० - २,२४९             -५६जानेवारी २०२१ - १,३ ८३             - ३३फेब्रुवारी २०२१ - ३,३७९             -३०मार्च २०२१ -            ६,३१२                        -६६

कोरोनाचे एकूण रुग्ण- ५६,६७८बरे झालेले रुग्ण- ५१,०१७एकूण कोरोना बळी- १,३३४सध्या उपचार सुरू असलेले- ४,३२७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद