शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पावणेतीन हजार पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:02 IST

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने मंगळवारी मध्यरात्रीपासून ते ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारला ...

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने मंगळवारी मध्यरात्रीपासून ते ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारला आहे. या कालावधीत विनापरवानगी कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडता येणार नाही. कोरोना विषाणूची शृंखला तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःहून लॉकडाऊन पाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आले. हा १० दिवसांचा लॉकडाऊन अत्यंत कडक व्हावा याकरिता पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. लॉकडाऊनमध्ये विनाकारण एकही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही याची खबरदारी पोलीस घेणार आहेत. याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ६२ तपासणी नाके असतील. प्रत्येक नाक्यावर एक पोलीस अधिकारी, आठ ते दहा कर्मचारी तैनात केले जात आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या विविध ब्रँचचे अधिकारी, कर्मचारी यांना राखीव स्ट्रायकिंग फोर्स म्हणून तैनात ठेवले जाईल. छावणी, सिडको, सिटी चौक, आणि उस्मानपुरा साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासोबत दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), यासोबतच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार चाकी आणि ३४ दुचाकी गस्तीवर असतील. पोलीस नियंत्रण कक्षाच्या ९ पीसीआर कार रात्रंदिवस गस्तीवर असतील, अशी माहिती विशेष शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक बनकर यांनी दिली.

=============

ग्रामीण पोलिसांची जय्यत तयारी

औरंगाबाद ग्रामीणमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी जय्यत तयारी केली. उपलब्ध पोलीस बलाच्या (७५ टक्के) १२०० अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंदोबस्तावर नेमले आहे. जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांना सोबत घेऊन लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल. प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा समिती स्थापन केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, ४ पोलीस उपअधीक्षक आणि अन्य अधिकारी जिह्यात गस्तीवर असतील.

===========

कोट

कोरोना संसर्ग सध्या प्रचंड वाढला आहे. हा संसर्ग अधिक पसरल्यास रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार नाहीत. यामुळे ३० मार्चच्या रात्रीपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नागरिकांनी घरात राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे.

=====

- मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण.