शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पावणेतीन हजार पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:02 IST

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने मंगळवारी मध्यरात्रीपासून ते ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारला ...

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने मंगळवारी मध्यरात्रीपासून ते ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारला आहे. या कालावधीत विनापरवानगी कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडता येणार नाही. कोरोना विषाणूची शृंखला तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःहून लॉकडाऊन पाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आले. हा १० दिवसांचा लॉकडाऊन अत्यंत कडक व्हावा याकरिता पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. लॉकडाऊनमध्ये विनाकारण एकही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही याची खबरदारी पोलीस घेणार आहेत. याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ६२ तपासणी नाके असतील. प्रत्येक नाक्यावर एक पोलीस अधिकारी, आठ ते दहा कर्मचारी तैनात केले जात आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या विविध ब्रँचचे अधिकारी, कर्मचारी यांना राखीव स्ट्रायकिंग फोर्स म्हणून तैनात ठेवले जाईल. छावणी, सिडको, सिटी चौक, आणि उस्मानपुरा साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासोबत दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), यासोबतच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार चाकी आणि ३४ दुचाकी गस्तीवर असतील. पोलीस नियंत्रण कक्षाच्या ९ पीसीआर कार रात्रंदिवस गस्तीवर असतील, अशी माहिती विशेष शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक बनकर यांनी दिली.

=============

ग्रामीण पोलिसांची जय्यत तयारी

औरंगाबाद ग्रामीणमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी जय्यत तयारी केली. उपलब्ध पोलीस बलाच्या (७५ टक्के) १२०० अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंदोबस्तावर नेमले आहे. जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांना सोबत घेऊन लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल. प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा समिती स्थापन केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, ४ पोलीस उपअधीक्षक आणि अन्य अधिकारी जिह्यात गस्तीवर असतील.

===========

कोट

कोरोना संसर्ग सध्या प्रचंड वाढला आहे. हा संसर्ग अधिक पसरल्यास रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार नाहीत. यामुळे ३० मार्चच्या रात्रीपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नागरिकांनी घरात राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे.

=====

- मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण.