वैजापूर : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याची गरज ओळखून वैजापूरचे माजी नगराध्यक्ष व मर्चंट बँंकेचे माजी चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी गेल्या काही वर्षांपासून शहरात वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तब्बल १९ हजार झाडांची लागवड झाली असून, त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. आगामी काळात मर्चंट बँकेच्या माध्यमातून ५० हजार झाडे लावण्याचे त्यांनी घोषित केले असून, निसर्गप्रेमींनी व वैजापूरकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन बाळासाहेब संचेती यांनी केले.
वैजापूर शहराला ''ग्रीन सिटी'' करण्याचा संचेती यांनी निर्धार केला आहे. वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना रोप व ट्रीगार्ड दिले जाणार आहे. प्रत्येक घरासमोर तीन झाडे लावून त्याची दीड वर्षे योग्य देखरेख करणे. वृक्ष सशक्त करणाऱ्या शहरातील तीन दाम्पत्यांना पारितोषिक व मोफत सिंगापूर टूर दिली जाणार आहे. दुसरे बक्षीस २१ हजार असून, यात ११ जणांची निवड होणार. तिसरे बक्षीस हे लहान मुलांसाठी असणार आहे. हा उपक्रम आगामी दहा दिवसांत वैजापूर मर्चंटच्या सहकार्याने राबविला जाणार आहे.
--
फोटो
260621\2149img-20210624-wa0206_1.jpg
बाळासाहेब संचेती