शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास हजार शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपये विमा कंपनीच्या घशात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:02 IST

फुलंब्री : तालुक्यातील पन्नास हजार शेतकऱ्यांनी २०२० मध्ये खरीप पिकासाठी भरलेले अडीच कोटी रुपये विमा कंपनीने आपल्या घशात ...

फुलंब्री : तालुक्यातील पन्नास हजार शेतकऱ्यांनी २०२० मध्ये खरीप पिकासाठी भरलेले अडीच कोटी रुपये विमा कंपनीने आपल्या घशात घातले असून, केवळ कांदा पिकाला विमा मंजूर करून अन्य महत्त्वाच्या पिकांना विमा नामंजूर केला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. या निर्णयाने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

फुलंब्री तालुक्यात २०२० मध्ये खरीप पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. यात जास्तीचा पाऊस पडल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा भरलेला असताना त्यांना केवळ कांदा पिकाला विमा मंजूर करण्यात आला, तर कपाशी, मका, तूर, सोयाबीन, बाजरी या पिकांचा विमा नामंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण खरिपाचे क्षेत्र ५६ हजार हेक्टर आहे. यातील २१ हजार हेक्टर क्षेत्रातील ५० हजार ५७७ शेतकऱ्यांनी कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, तूर, कांदा या पिकांकरिता एकूण दोन कोटी ५६ लाख ५८ हजार रुपये एचडीएफसी अग्रो या विमा कंपनीला भरलेले आहे. यातील कांदा पिकाला २७४ शेतकऱ्यांना ११ लाख रुपये मंजूर झाले आहे.

चौकट -

तालुक्यात पीकनिहाय झालेले क्षेत्र

कापूस : ९०७ हेक्टर, मका : ७८४ हेक्टर, मुग : ३८५ हेक्टर, तूर : ५ हेक्टर, तसेच २० हेक्टरवर अन्य पिकांचा समावेश आहे. अशी एकूण २ हजार १०२ हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. मुळात या आकडेवारीची शासनदरबारी नोंद झालेली आहे. असे असतानासुद्धा विमा कंपनीने याकडे दुर्लक्ष करीत पीक विमा मंजूर केला नाही.

कोट -

अतिवृष्टी झाल्यास महसूल, कृषी व ग्रामविकास या तीन यंत्रणाद्वारे पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादन कमी आहे की जास्त याचा अहवाल सादर केला जातो. त्या अहवालावरून विमा कंपनी निर्णय घेते. - काकासाहेब इंगळे, तालुका कृषी अधिकारी.

कोट

मागील वर्षी मी खरीप पिकात कपाशीचा विमा काढला होता. या पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असताना याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. विमा कंपनीने यंदा विमा नाकारल्याची माहिती मिळाली. - रवींद्र गायकवाड, गणोरी, शेतकरी.

----

बातमीत जुन्या बातमीचे कट वापरू शकता.