शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अडीच महिन्यांपासून पन्नास शिक्षक गायब

By admin | Updated: September 20, 2016 00:22 IST

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने (आपसी) अन्य जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांपैकी सुमारे ५० शिक्षक गेल्या अडीच महिन्यांपासून शाळेत रुजूच झालेले नाहीत.

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने (आपसी) अन्य जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांपैकी सुमारे ५० शिक्षक गेल्या अडीच महिन्यांपासून शाळेत रुजूच झालेले नाहीत. रेकॉर्डवर शिक्षक दिसतात; मात्र ते प्रत्यक्षात शाळेत गेलेलेच नाहीत. परिणामी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालकांकडून शिक्षकांच्या मागणीमुळे शिक्षण विभाग सध्या जेरीस आला आहे. जिल्हा परिषदेत सध्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न स्फोटक बनला आहे. आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना रुजू करून घ्यावे, अशी मागणी करणाऱ्या शिक्षकांनी एक नवी संघटनाही स्थापन केली आहे. काही जि. प. सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचाही प्रयत्न या शिक्षकांनी केलेला आहे. अलीकडच्या काळात शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीने (आपसी) जाणाऱ्या शिक्षकांना नाहरकत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर त्यांच्या जागेवर येणारे शिक्षक त्या- त्या जिल्ह्यांतून कार्यमुक्त झाले. त्यांच्या जागांवर येथून गेलेले शिक्षक तिकडे रुजूही झाले. मात्र, येथे आलेल्या शिक्षकांपैकी जवळपास ५० पेक्षा जास्त शिक्षक अद्यापही जि. प. शाळांमध्ये रुजू झालेले नाहीत. ठिकठिकाणच्या जि. प. शाळांतील शालेय समितीचे सदस्य, अनेक ग्रामस्थ व पालकांनी शिक्षण सभापती विनोद तांबे, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांची भेट घेऊन शिक्षक देण्याची मागणी केली. शिक्षक दिला नाही तर शाळेला कुलूप लावण्याचा इशाराही दिला. तेव्हा कुठे हा प्रकार समोर आला. आंतरजिल्हा बदलीने औरंगाबाद जिल्ह्यात आलेल्या या शिक्षकांना सोयीची शाळा हवी आहे. आपसी बदलीने आलेल्या शिक्षकांना येथून गेलेल्या शिक्षकांच्याच शाळेत अध्यापन करणे बंधनकारक आहे. पण, या शिक्षकांनी सोयीची शाळा मिळण्यासाठी सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ‘फिल्ंिडग’ लावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी सांगितले की, आंतरजिल्हा बदलीने (आपसी) आलेल्या शिक्षकांनी मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणे गरजेचे आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून हे शिक्षक शाळेवर रुजूच झालेले नाहीत, ही गंभीर बाब आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी त्या शिक्षकांना नोटिसा बजवाव्यात. त्यानंतरही ते जर शाळेत हजर झाले नाहीत, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. उद्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आवाज उठविणार आहे, असेही तांबे म्हणाले.