शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
3
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
5
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
6
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
7
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
8
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
9
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
10
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
11
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
12
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
13
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
14
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
15
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
16
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
17
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
18
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
19
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
20
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

अडीच महिन्यांपासून पन्नास शिक्षक गायब

By admin | Updated: September 20, 2016 00:22 IST

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने (आपसी) अन्य जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांपैकी सुमारे ५० शिक्षक गेल्या अडीच महिन्यांपासून शाळेत रुजूच झालेले नाहीत.

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने (आपसी) अन्य जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांपैकी सुमारे ५० शिक्षक गेल्या अडीच महिन्यांपासून शाळेत रुजूच झालेले नाहीत. रेकॉर्डवर शिक्षक दिसतात; मात्र ते प्रत्यक्षात शाळेत गेलेलेच नाहीत. परिणामी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालकांकडून शिक्षकांच्या मागणीमुळे शिक्षण विभाग सध्या जेरीस आला आहे. जिल्हा परिषदेत सध्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न स्फोटक बनला आहे. आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना रुजू करून घ्यावे, अशी मागणी करणाऱ्या शिक्षकांनी एक नवी संघटनाही स्थापन केली आहे. काही जि. प. सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचाही प्रयत्न या शिक्षकांनी केलेला आहे. अलीकडच्या काळात शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीने (आपसी) जाणाऱ्या शिक्षकांना नाहरकत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर त्यांच्या जागेवर येणारे शिक्षक त्या- त्या जिल्ह्यांतून कार्यमुक्त झाले. त्यांच्या जागांवर येथून गेलेले शिक्षक तिकडे रुजूही झाले. मात्र, येथे आलेल्या शिक्षकांपैकी जवळपास ५० पेक्षा जास्त शिक्षक अद्यापही जि. प. शाळांमध्ये रुजू झालेले नाहीत. ठिकठिकाणच्या जि. प. शाळांतील शालेय समितीचे सदस्य, अनेक ग्रामस्थ व पालकांनी शिक्षण सभापती विनोद तांबे, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांची भेट घेऊन शिक्षक देण्याची मागणी केली. शिक्षक दिला नाही तर शाळेला कुलूप लावण्याचा इशाराही दिला. तेव्हा कुठे हा प्रकार समोर आला. आंतरजिल्हा बदलीने औरंगाबाद जिल्ह्यात आलेल्या या शिक्षकांना सोयीची शाळा हवी आहे. आपसी बदलीने आलेल्या शिक्षकांना येथून गेलेल्या शिक्षकांच्याच शाळेत अध्यापन करणे बंधनकारक आहे. पण, या शिक्षकांनी सोयीची शाळा मिळण्यासाठी सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ‘फिल्ंिडग’ लावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी सांगितले की, आंतरजिल्हा बदलीने (आपसी) आलेल्या शिक्षकांनी मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणे गरजेचे आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून हे शिक्षक शाळेवर रुजूच झालेले नाहीत, ही गंभीर बाब आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी त्या शिक्षकांना नोटिसा बजवाव्यात. त्यानंतरही ते जर शाळेत हजर झाले नाहीत, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. उद्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आवाज उठविणार आहे, असेही तांबे म्हणाले.