शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

पंधरा वर्षांपूर्वीच्या विहिरीने दिला आधार

By admin | Updated: February 6, 2015 00:56 IST

लोहारा : प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील ग्रामस्थांनी गावस्तरावर नियोजन करीत गावचा

लोहारा : प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील ग्रामस्थांनी गावस्तरावर नियोजन करीत गावचा पाणीप्रश्न मार्गी लावला आहे. यासाठी पंधरा वर्षांपूर्वी घेतलेल्या विहिरीचा आधार मिळाला असून, ग्रामपंचायतीने स्वखर्चातून पाईपलाईन दुरुस्ती व नवीन पाईपलाईनची कामे पूर्ण केली आहे. त्यामुळे गावात सध्या चोवीस तास मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.हिप्परगा (राव) हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी आजतागायत कुठलीही योजना राबविण्यात आलेली नाही. शिवाय गावात कुठेही अंतर्गत पाईपलाईन नाही. त्यामुळे नळ कनेक्शनचा प्रश्नच नाही. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सहा टाक्यांवरून नागरिकांना पाणी घेऊन जावे लागते. नाही म्हणायला सन २००१-०२ या वर्षात जीवन प्राधीकरणांतर्गत येथे कायमस्वरूपी योजनेला मुहूर्त सापडले होते. यातून विहीर खोदून गावापर्यंत पाईपलाईनही टाकण्यात आली. मात्र, यानंतर योजनेसाठी निश्चित केलेला कालावधी संपुष्टात आल्यामुळे योजना बंद पडली. त्यामुळे ग्रामस्थांचा पाणीप्रश्न सुटू शकला नाही. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करणसाठी ग्रामपंचायतीकडून स्त्रोतांचे अधिग्रहण केले जात होते. यंदा तर अत्यल्प पावसामुळे उन्हाळ्यापूर्वीच गावकऱ्यांना टंचाईचे चटके बसू लागले आहेत. ग्रामपंचायतीचे गावात तीन विद्युत पंप असले तरी पाणीपातळी खालावल्याने दोन बंद पडले असून, एक पंप शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे यंदा पुन्हा पर्यायी स्त्रोतांचा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर उभा ठाकला. यावर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्रित येवून २००१-०२ मध्ये जवीन प्राधीकरणांतर्गत योजनेसाठी घेतलेल्या विहिरीचा टंचाई काळात काही वापर होतो का, याबाबत विचारविनिमय केला. तलावात असलेल्या या विहिरीची पाहणी केली असता यात मुबलक पाणीसाठा असल्याचेही दिसून आले आणि हीच विहीर आता आपली पाणीटंचाईतून सुटका करू शकेल, असा विश्वास ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला. योजना मंजूर झाल्यानंतर या विहिरीपासून गावापर्यंत दोन किमी अंतराची पाईपलाईन टाकण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक ठिकाणी गळती लागली होती. ग्रामपंचायतीने यासाठी स्वनिधी खर्च करून काही ठिकाणी दुरूस्ती तर काही ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून ती गावातील सहाही टाक्यांना जोडण्यात आली आहे. त्यामुळे सध्या गावकऱ्यांना चोवीस तास मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. हिप्परगा ग्रामस्थांनी योग्य नियोजन करून गावचा पाणीप्रश्न मार्गी लावून इतर गावांसमोर आदर्श घालून दिला आहे. (वार्ताहर)