शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विकासासाठी पंधरा गावे घेतली दत्तक

By admin | Updated: September 5, 2016 01:01 IST

परळी : फुलोरा फाऊंडेशनच्या वतीने परळी तालुक्यातील १५ गावांची निवड करण्यात आली असून, त्या ठिकाणी सार्वजनिक विकासाची कामे केली जाणार आहेत.

परळी : फुलोरा फाऊंडेशनच्या वतीने परळी तालुक्यातील १५ गावांची निवड करण्यात आली असून, त्या ठिकाणी सार्वजनिक विकासाची कामे केली जाणार आहेत. यामुळे त्या गावांचा कायापालट होणार आहे.परळी येथे आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी फुलोरा फाऊंडेशनचे सर्वेसर्वा मयांक गांधी यांनी आपली विकासाबाबती भूमिका स्पष्ट करताना गावांचा शाश्वत विकास करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ. हरिश्चंद्र वंगे, डॉ. दे.घ. मुंडे, शिवाकांत अंदुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मयांक गांधी म्हणाले, गाव बदलल्याशिवाय देश बदलणार नाही, ही महात्मा गांधींची विचारसरणी आजही कायम आहे. ग्रामीण भागाचा कायापालट होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याची निवड केली आहे. फुलोरा फाऊंडेशन १५ गावांमध्ये मोठी कामे करणार आहे. झालेला कमी पाऊस आणि दुष्काळाचे संभाव्य सावट लक्षात घेता. ग्रामस्थांचा आर्थिक स्रोत वाढविणार असल्याचे गांधी म्हणाले. शेतकऱ्यांना शेवगा, दुधी भोपळा, कारल्याची झाडे दिले असून, त्यातून उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना शेळी व कोंबड्या दिल्या असून, गाभण शेळ्यातील पुढे जन्मणाऱ्या पिलांचे वाटप करणार असल्याचे ते म्हणाले. केवळ शेतीवरच विसंबून राहता येणार नसल्याने एका नामांकित कंपनीसोबत करार करणार असून, त्या मार्फत ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. आरोग्य शिबिरे, ड्रीप इरिगेशन शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. तसेच दारुचे व्यसन व हुंडा पद्धती मुळापासून उखडून काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. १५ गावांमध्ये सलग तीन वर्षे काम केले जाणार असून, ही सर्व कामे मोफत केली जाणार आहेत. यासाठी आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मदत मिळणार आहे. याचा लाभ गावांना होईल. (वार्ताहर)