शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र जळाल्याने पंधरा दिवसापासून आव्हाना अंधारात

By admin | Updated: August 11, 2014 00:04 IST

आव्हाना: भोकरदन तालुक्यातील आव्हाना यैथील रोहित्र जळाल्याने गेल्या १५ दिवसांपासून गावात अंधाराचे साम्राज्य आहे.

आव्हाना: भोकरदन तालुक्यातील आव्हाना यैथील रोहित्र जळाल्याने गेल्या १५ दिवसांपासून गावात अंधाराचे साम्राज्य आहे. याकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ महावितरण विरूद्ध संताप व्यक्त करीत आहे.गावाची लोक संख्या ७ हजारावर आहे. गावात एकूण तीन रोहित्र आहे. पैकी एक रोहित्र पूर्ण जळाले आहे. त्यामुळे गाव अंधारात आहे. जळालेले रोहित्र दुरूस्तीसाठी महावितरणच्या कार्यालयात नेण्यासाठी ग्रामस्थांनी प्रत्येकांकडून ५० रूपये प्रमाणे लोकवर्गनी गोळा केली. त्यातून खाजगी वाहन करून जळालेले रोहित्र भोकरदन येथील महावितरणच्या कार्यालयात पाठविले. मात्र अद्यापपर्यंत ते रोहित्र दुरूस्त करून आलेले नाहीत. त्याचा पाठपुरवा कोण करणार म्हणून ग्रामपंचायतनेही कानावर होत ठेवले आहे. खुद्द ग्रामपंचायतच याबाबत उदासिन असल्याने महावितरण व ग्रामपंचायतच्या मध्ये ग्रामस्थ मात्र भरडल्या जात आहेत. मागील १५ दिवसांपासून गावात अंधाराचे साम्राज्य असल्याने ग्रामस्थांना पिठाची गिरणी बंद आहे. लोकांना दळणासाठी दुसऱ्या गावी जावे लागत आहे. यापूर्वीही सुमारे २० दिवस रोहित्र जळाल्याने गाव अंधारात होते. त्यावेळी स्वत: पिठाच्या गिरणी मालकाने पुढाकार घेवून रोहित्र बदलून आणले होते. यावेळी कोणी पुढाकार घेत नसल्याने तसेच महावितरणचे अधिकारीही रोहित्र दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)