शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

रोहित्र जळाल्याने पंधरा दिवसापासून आव्हाना अंधारात

By admin | Updated: August 11, 2014 00:04 IST

आव्हाना: भोकरदन तालुक्यातील आव्हाना यैथील रोहित्र जळाल्याने गेल्या १५ दिवसांपासून गावात अंधाराचे साम्राज्य आहे.

आव्हाना: भोकरदन तालुक्यातील आव्हाना यैथील रोहित्र जळाल्याने गेल्या १५ दिवसांपासून गावात अंधाराचे साम्राज्य आहे. याकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ महावितरण विरूद्ध संताप व्यक्त करीत आहे.गावाची लोक संख्या ७ हजारावर आहे. गावात एकूण तीन रोहित्र आहे. पैकी एक रोहित्र पूर्ण जळाले आहे. त्यामुळे गाव अंधारात आहे. जळालेले रोहित्र दुरूस्तीसाठी महावितरणच्या कार्यालयात नेण्यासाठी ग्रामस्थांनी प्रत्येकांकडून ५० रूपये प्रमाणे लोकवर्गनी गोळा केली. त्यातून खाजगी वाहन करून जळालेले रोहित्र भोकरदन येथील महावितरणच्या कार्यालयात पाठविले. मात्र अद्यापपर्यंत ते रोहित्र दुरूस्त करून आलेले नाहीत. त्याचा पाठपुरवा कोण करणार म्हणून ग्रामपंचायतनेही कानावर होत ठेवले आहे. खुद्द ग्रामपंचायतच याबाबत उदासिन असल्याने महावितरण व ग्रामपंचायतच्या मध्ये ग्रामस्थ मात्र भरडल्या जात आहेत. मागील १५ दिवसांपासून गावात अंधाराचे साम्राज्य असल्याने ग्रामस्थांना पिठाची गिरणी बंद आहे. लोकांना दळणासाठी दुसऱ्या गावी जावे लागत आहे. यापूर्वीही सुमारे २० दिवस रोहित्र जळाल्याने गाव अंधारात होते. त्यावेळी स्वत: पिठाच्या गिरणी मालकाने पुढाकार घेवून रोहित्र बदलून आणले होते. यावेळी कोणी पुढाकार घेत नसल्याने तसेच महावितरणचे अधिकारीही रोहित्र दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)