शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन शिक्षणाद्वारे विषमतेला खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे देशात सगळीकडेच ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. या ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी असून, त्यामाध्यमातून ...

औरंगाबाद : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे देशात सगळीकडेच ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. या ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी असून, त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण होणार आहे, असे मत कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले.

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे दर रविवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी ‘न्याय व सर्वसमावेशक शिक्षणाचे चिंतन’ या विषयावर मांडणी केली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे होते.

यावेळी डॉ. साळुंखे म्हणाले, पूर्वी गुरुकुल पद्धत होती. त्यात समर्पण भावनेने शिक्षण मिळत होते. काही दिवसांपूर्वी नवीन शैक्षणिक धोरण आले असून या माध्यमातून तब्बल ३४ वर्षांनी चांगले पाऊल उचललेले आहे. या धोरणात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. या धोरणात मागास, आदिवासीसह इतर प्रवर्गासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत;मात्र या प्रवर्गातील अतिसूक्ष्म समाजघटकांचा डाटाच उपलब्ध नाही. त्यांच्यापर्यंत शिक्षण कसे पाेहोचवणार, याविषयी तरतूद करण्याची गरज आहे.

अध्यक्षीय समारोपात डॉ. राजेश करपे म्हणाले, सध्या शिक्षणाचे बाजारीकरण सुरू आहे. ते रोखण्यासाठी आम्ही विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेतले; मात्र राज्य शासनातील मंत्र्यांनी विद्यापीठाची भूमिका लक्षात न घेता कागदोपत्री असलेल्या महाविद्यालयांना मान्यता दिली. शिक्षणाच्या बाजारीकरणाला आम्ही शक्य तेवढ्या मार्गांनी विरोध करणार आहोत, असे डॉ. करपे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा. फेरोज सय्यद यांनी मानले. तांत्रिक सहाय्य निखिल भालेराव यांनी केले.

चौकट.........

खासगीकरणात ठोस धोरण असावे

सध्या जगभरात उच्चशिक्षणासह शालेय शिक्षणातही खासगीकरण होत आहे. खासगी विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये नफेखोरीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अशा शिक्षण संस्थांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ठोस धोरण असले पाहिजे. याचबरोबर त्याची अंमलबजावणीही होते की नाही, हे पाहण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे, असे मत डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केले.