शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

चार महिन्यांत तिसºयांदा भिजली खताची पोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:35 IST

रेल्वेस्टेशन मालधक्क्यावरील खताची पोती दरवर्षी पावसाळ्यात भिजत आहेत. गेल्या चार महिन्यांत तिसºयांदा खताची पोती भिजली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रेल्वेस्टेशन मालधक्क्यावरील खताची पोती दरवर्षी पावसाळ्यात भिजत आहेत. गेल्या चार महिन्यांत तिसºयांदा खताची पोती भिजली.मालधक्क्यावर शेडची अपुरी सुविधा आहे. उघड्यावर खत उतरविल्यानंतर त्यांची काळजी घेण्याकडे माल वाहतूकदार दुर्लक्ष करतात. त्यामुळे खत भिजण्याचा फटका शेतकºयांना बसतो.शहरात बुधवारी सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसात मालधक्क्यावर युरिया खताची शेकडो पोती भिजली. दोन मालगाड्यांद्वारे अनुक्रमे २५०० आणि १८०० टन युरियाची पोती मालधक्क्यावर आली होती. पावसाचा अंदाज असूनही पोती ताडपत्रीने झाकण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. सायंकाळी पावसाला सुरुवात होताच अनेक पोती पाण्यात भिजली. गुरुवारी सकाळपर्यंत अनेक पोती उघडीच पडून होती. पावसामुळे खतांची झालेली दुरवस्था स्पष्ट दिसत होती. खत भिजल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहे; परंतु रेल्वे प्रशासन आणि माल वाहतूकदार यातून कोणताही धडा घ्यायला तयार नाही. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही.शेड वाढवामालधक्क्यावर आजघडीला केवळ ११ मालडब्यांच्या क्षमतेचे शेड आहे. प्रत्यक्षात ४२ मालडबे येतात. त्यामुळे शेड वाढविण्याची मागणी होत आहे. मालगाडीत माल ठेवल्यास शुल्क द्यावे लागते. रेल्वे आल्यानंतर ९ तासांच्या आत माल उतरवून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक पोत्यासाठी प्रतितास १५० रुपये आकारले जातात. हे शुल्क वाचविण्यासाठी उघड्यावर माल उतरविला जात असल्याचे सांगितले जाते.