शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अंभई येथे जादा दराने खतविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:04 IST

जिल्ह्यातील पहिली कारवाई : ३२ परवानेही निलंबित औरंगाबाद : कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संनियंत्रण कक्षाला अंभई येथे जादा ...

जिल्ह्यातील पहिली कारवाई : ३२ परवानेही निलंबित

औरंगाबाद : कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संनियंत्रण कक्षाला अंभई येथे जादा दराने खतविक्रीबाबत तक्रार नोंदवली गेली होती. त्या अनुषंगाने सिल्लोड येथील खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी आर.व्ही. शेख यांनी सापळा रचून अंभई येथील शिवसाई ॲग्रो एजन्सीज येथे तपासणी केली व जादा दराने खतविक्री करताना आढळून आल्याने त्या विक्रेत्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही पहिली कारवाई ठरली.

खतांच्या दरांची खात्री करण्यासाठी डमी ग्राहक पाठविला असता शिवसाई ॲग्रो एजन्सी येथे १०:२६:२६ प्रकारच्या खताची १३७५ रुपये किंमत असताना डमी ग्राहकाला बॅग रुपये १४०० रुपयांना कच्ची पावती देऊन विक्री केल्याचे आढळून आले. खतविक्री करताना आधार क्रमांक, शेतकऱ्याचा अंगठा ई-पॉज मशीनवर न नोंदवता खतविक्री करण्यात आली. त्यामुळे संबंधित कृषिसेवा केंद्रावर खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कारवाई करण्यात आली असून, संबंधिताचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली.

---

३२ केंद्रांवर खतांच्या साठ्यात तफावत

कृषी विभागामार्फत ई-पॉज मशीनवर नोंदणी व प्रत्यक्षातील साठ्यांची तपासणी अभियान हंगामापूर्वी राबविण्यात आले असून, ३२ विक्रेत्यांकडे एकूण १००२ मे. टन खताची तफावत आढळून आल्याने संबंधित विक्रेत्यांचे परवाने हंगामापूर्वीच निलंबित करण्यात आले आहेत, असेही गंजेवार यांनी सांगितले.

--

१३ तक्रारी आल्या

--

राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर संनियंत्रण कक्ष शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आले आहेत. त्यात आतापर्यंत राज्यस्तरावर नऊ, तर जिल्हास्तरावर पाच तक्रारी ई-मेल आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ऑनलाइन दाखल झाल्या. त्या सर्व तक्रारींचा निपटारा व शेतकऱ्यांचे शंका निरसन करण्यात आल्याचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांनी सांगितले.