शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जिल्ह्यात खत, बियाणे मुबलक

By admin | Updated: May 28, 2014 00:22 IST

बीड : खत, बियाणांसाठी मागील काही वर्षांपासून शेतकर्‍यांची धावाधाव होत होती. विशिष्ट बियाणांसाठी शेतकर्‍यांना लाठ्या-काठ्याही खाव्या लागल्या

 बीड : खत, बियाणांसाठी मागील काही वर्षांपासून शेतकर्‍यांची धावाधाव होत होती. विशिष्ट बियाणांसाठी शेतकर्‍यांना लाठ्या-काठ्याही खाव्या लागल्या. यंदा मात्र अशी स्थिती राहणार नाही. कारण कृषी विभागाने मुबलक प्रमाणात बियाणे, खत उपलब्ध केले आहे. जिल्ह्याचे सर्वसाधारण खरीप क्षेत्र ५ लाख ६५ हजार ७०० हेक्टर आहे. जवळपास साडेतीन लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने १६ लाख ९६ हजार कापूस बियाणांच्या पाकिटांची मागणी केली होती. त्यानुसार ९ लाख १७ हजार पाकिटे मे अखेर उपलब्ध झाली आहेत. या शिवाय २ लाख ४ हजार मे. टन खताची मागणी नोंदविली होती. त्यापैकी ६३ हजार मे. टन खत प्राप्त झाले आहे. उर्वरित खत व बियाणे टप्प्याने टप्प्याने प्राप्त होणार आहेत. कणक बियाणांची मागणी कायम असून यंदा साडेतीन लाख पाकिटे येणार आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी दिली. खरीप हंगामात तूर, मुग, उडीद, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग, मका, बाजरी ही पिकेही घेतली जातात. या पिकांचाही मुबलक साठा असल्याचे ते म्हणाले. मागणी नोंदविल्या प्रमाणे टप्प्या- टप्प्याने बियाणे व खते उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. बियाणे, खतासाठी शेतकर्‍यांना रांगेत थांबावे लागण्याची परिस्थिती यंदा नाही, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी सांगितले. अडवणूक झाल्यास किंवा मूळ किमतीच्या अधिक पैसे मागितले तर तक्रारी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. सोयाबीन पेरणीसाठी वापरा घरचे बियाणे शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे विकत घेण्यापेक्षा घरचेच बियाणे लागवड करावे, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी केले आहे. घरच्या बियाणांची उगवण क्षमता अधिक चांगली आहे. लागवड करण्यापूर्वी बियाणांवर पाणी शिंपडावे. त्यानंतर थायरम किंवा बाविस्टीन लावून त्याची पेरणी करावी. त्यानंतर सोयाबीन लवकर उगवून येण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) जिल्ह्यात बियाणे, औषधी, खत विकण्यासाठी यंदा कृषी विभागामार्फत एक हजार परवाने वितरित करण्यात आले आहेत. यावेळी परवाने प्रथमच आॅनलाईन झाले आहेत. त्यामुळे कृषी परवान्यांवर थेट कृषी विभागाचे लक्ष राहणार आहे. बेकायदेशीररित्या खत, बियाणे विक्री करणार्‍यांवर तसेच खत, बियाणांची परजिल्ह्यात विल्हेवाट लावणार्‍यांविरूद्ध कृषी विभागाची करडी नजर आहे. जिल्ह्यात एकूण ३६ पथके तैनात करण्यात आली आहेत. पीक मागणी पुरवठा कापूस १६ लाख ९६ हजार ९ लाख १७ हजार बाजरी १८७५ ३७६ तूर १७२२ २९९ उडीद २२३५ ६४४ भुईमूग १०५० १४४ मका १८९० २०० सोयाबीन ५९२६० १३३७०