शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मेथी १ रुपया, वांगे ५ रुपये, बटाटे २ रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:05 IST

सबसे सस्ता इतवार, कोई भी सब्जी लो १० रुपये में १० गड्डी... इससे सस्ता नहीं मिलेगा कहीं, लो भाई लो सोचो मत आज सस्ता कल का भरोसा नहीं ’... असे ओरडत जाधववाडीतील अडत फळ-भाजीपाला बाजारात पालेभाज्या विकल्या जात होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘सबसे सस्ता इतवार, कोई भी सब्जी लो १० रुपये में १० गड्डी... इससे सस्ता नहीं मिलेगा कहीं, लो भाई लो सोचो मत आज सस्ता कल का भरोसा नहीं ’... असे ओरडत जाधववाडीतील अडत फळ-भाजीपाला बाजारात पालेभाज्या विकल्या जात होत्या. मेथी,पालक, चुका, कोथिंबीर १ रुपयाला गड्डी विकूनही शिल्लक राहिलेल्या शेकडो पालेभाज्या तिथेच टाकून शेतकरी निघून गेले. त्या पालेभाज्यांवर नंतर गायी, म्हशींनी मनसोक्त ताव मारला.रविवारच्या पहाटे जाधववाडीतील फळ भाजीपाल्याच्या अडत बाजारात पालेभाज्यांची विक्रमी आवक झाली होती. जिकडे तिकडे भाज्याच भाज्या दिसत होत्या. अवघ्या १० रुपयांत १० गड्डी मेथी विकल्या जात होती. पालेभाज्यांमध्ये सर्वाधिक मेथीची भाजी विकल्या जाते. तिच १ रुपया गड्डी मिळत असल्याने बाकीच्या पालेभाज्यांचे भावही गडगडले. पालक, शेपू, कोथिंबीर, पुदिना १० रुपयांना १० गड्डी, तर १० रुपयाला कांदापात, २ रुपयाला मोठा मुळा, अळूच्या पानाच्या ५ गड्डी १० रुपयाला विकल्या जात होत्या. प्रत्येक शेतकरी व विक्रेत्यासमोर भाज्यांचा ढीग होता. त्यातून निवडून निवडून भाज्या खरेदी केल्या जात होत्या. भाज्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. सिडको-हडको व आसपासच्या परिसरातील हजारो ग्राहक भाज्या खरेदीसाठी जाधववाडीत आले होते. फळ भाज्यांमध्ये वांगे, फुलकोबी, पत्ताकोबी ५ रुपये किलो, काकडी २ ते ५ रुपये किलो विकत होती. एवढ्या मातीमोल भावात पाले व फळभाज्या विक्री होऊनही शेकडो गड्ड्या शिल्लक राहिल्या त्या तिथेच सोडून शेतकरी व विक्रेते घरी गेले. यानंतर या भाज्यांवर गाई,म्हशींनी मनसोक्त ताव मारला. अडत व्यापारी इलियास बागवान यांनी सांगितले की, जाधववाडीत १५ ते २० टन फळभाज्यांची आवक झाली.गुजरातचा बटाटा मातीमोलमध्य प्रदेश, पंजाबमधून नवीन बटाट्याची आवक सुरू झाली आहे. गुजरातमध्ये शीतगृहात बटाट्याचा बंफर साठा करून ठेवण्यात आला आहे. भाव गडगडत असल्याने शीतगृहातील बटाटा मातीमोल भावात विकला जात आहे. औरंगाबादेत रविवारी ठोक विक्रीत २ ते ३ रुपये प्रतिकिलोने गुजराती बटाटा विकला गेला, तर इंदोरचा बटाटा ६ रुपये किलोने विकला जात होता.जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बटाट्याचे ठोक व्यापारी मुजीबशेठ जम्मूशेठ यांनी सांगितले की, गुजरातमध्ये शीतगृहात बटाट्याचा जुना साठा मोठ्या प्रमाणात आहे. तिथे फुकटमध्ये बटाटा दिला जात आहे. हमाली व गाडीभाडे भरूनही औरंगाबादेत या बटाट्याला २०० ते ३०० रुपये क्विंटलपेक्षा जास्त भाव मिळाला नाही.इंदोरहून येणारा बटाटा ६०० रुपये क्विंटल विकत आहे. हा बटाटा आतून पांढºया रंगाचा असून चवीला फिकट असतो. यामुळे इंदोरच्या बटाट्याला मागणी आहे. जाधववाडीत दररोज १० ट्रकपेक्षा अधिक बटाट्याची आवक होत आहे. नवीन बटाटा साठविण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेशातील शीतगृह जुना बटाटा लवकर विकून मोकळे होत आहेत. परिणामी, बटाटा मातीमोल भावात विकला जाऊ लागला आहे.शेतकºयांच्या डोळ्यात अश्रूलासूर स्टेशन येथील गाजगाव येथून वांग्याचे २० कॅरेट विक्रीला घेऊन आलेले विशाल रांगेकर स्वत:च वांगे विकत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी ६० रुपये किलोने वांगे विकले होते. आज ५ रुपये किलोने वांगे विकावे लागत होते, तरीही निम्मे वांगे शिल्लक राहिल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. भाड्याचेही पैसे निघाले नाही, अशीच परिस्थिती अन्य शेतक-यांची झाली होती.