शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांत लसीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : अवघ्या देशवासीयांचे कोरोना लसीकडे डोळे लागले आहेत. या महामारीला संपविण्यासाठी लसीकडे वैद्यकीय शस्त्र म्हणून पाहिले ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : अवघ्या देशवासीयांचे कोरोना लसीकडे डोळे लागले आहेत. या महामारीला संपविण्यासाठी लसीकडे वैद्यकीय शस्त्र म्हणून पाहिले जात आहे; मात्र लसीकरणानंतर शरीरावर काही परिणाम होईल का, ही भीती सध्या ५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना सतावत आहे. त्यातूनच पहिल्या टप्प्याऐवजी तिसऱ्या टप्प्यांत म्हणजे ५० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणादरम्यान लस घेण्याची मानसिकता वाढत आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लस केवळ आरोग्यसंबंधित डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. गेल्या वर्षभर कोरोनायुद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लस मिळणार असल्याने समाधान व्यक्त आहे. परंतु, ५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना वेगळीच चिंता सतावत आहे. यातील अनेकांना मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, आदी आजार आहेत. त्यातून काही दुष्परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याऐवजी तिसऱ्या टप्प्यात लस घेण्यास प्राधान्य देऊ, असे मत ५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी वरिष्ठांकडे व्यक्त करीत आहेत.

वरिष्ठांनी निर्माण करावा विश्वास

लसीबाबतचा गैरसमज, चुकीची माहिती आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती यामुळे लसीकरणाबाबतची उदासीनता वाढीला लागते. कोणत्याही गैरसमजांना खतपाणी मिळू नये यासाठी लसीकरणाच्या प्राथमिक टप्प्यापासून ही उदासीनता घालविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. लस टोचून घ्यावी यासाठी लसीबाबत मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रारंभी लस घेऊन हा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे.

चौकट....

अर्धा तास ठेवणार लक्ष

लसीकरण केंद्रावर लस घेतल्यानंतर पुढील अर्धा तास लसीचे परिणाम पाहण्यासाठी व्यक्तीला तेथे थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लस ही फायदेशीरच

नियोजित टप्प्यांनुसार लसीकरण पार पाडले जाणार आहे. लसीविषयी कोणत्याही प्रकारे भीतीचे वातावरण नाही. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही लस फायदेशीर ठरणार आहे.

- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

‌‘आयएमए’तर्फे आवाहन

काही प्रमाणात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांत लसीची भिती आहे. लसीकरणानंतर जेव्हा लोक ठणठणीत दिसतील, तेव्हा ही भीती आपोआप दूर होईल. लस घेणे हे बंधनकारक नाही; पण नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी नोंदणी केलेली नाही, अशांना नोंदणी करण्याचे आवाहन ‘आयएमए’तर्फे केले जात आहे.

- डॉ. संतोष रंजलकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)