शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

By admin | Updated: October 7, 2016 01:32 IST

औरंगाबाद : अनुदानाच्या मागणीसाठी मंत्रिमंडळ बैठकीवर विनाअनुदानित कृती समितीने नेलेल्या मोर्चात सहभागी शिक्षकांना पोलीस कधीही अटक करू शकतात,

औरंगाबाद : अनुदानाच्या मागणीसाठी मंत्रिमंडळ बैठकीवर विनाअनुदानित कृती समितीने नेलेल्या मोर्चात सहभागी शिक्षकांना पोलीस कधीही अटक करू शकतात, असे ‘मेसेज’ फिरल्यामुळे आज गुरुवारी शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, अनेक शिक्षकांनी आपले मोबाईल बंद करून भूमिगत होणेच पसंत केले. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिक्षकांनी मोर्चा नेला होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. अनेक शिक्षकांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले. एकीकडे अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची जामिनावर सुटका करण्याच्या तयारीत असलेल्या शिक्षकांच्या ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर मोर्चात सहभागी असलेल्या शिक्षकांना शाळेत जाऊन अटक केली जाणार असल्याचे ‘मेसेज’ फिरले. पोलिसांकडे व्हिडिओ शूटिंग असून, त्यात दिसणाऱ्या शिक्षकांची माहिती जमा करून त्यांना अटक केली जाणार आहे, अशा चर्चेला ऊत आला. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची घबराट पसरली असून, अनेक शिक्षक हे मोबाईल बंद करून भूमिगत झाले. काही जणांनी मोबाईलवर आलेले अनोळखी कॉलही टाळले. एकीकडे पोलिसांकडून अटक करण्याची भीती, तर दुसरीकडे गैरहजर राहिल्यास संस्थाचालकांकडून निलंबित केली जाण्याची भीती, अशी डोक्यावर टांगती तलवार घेऊन शिक्षक वावरत आहेत. दरम्यान, अनेक शिक्षक संघटनांनी लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध करून शिक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नियमानुसार ४८ तास पोलीस कोठडीत असलेल्या सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होते. ४आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिक्षकांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मोर्चेकरी शिक्षकांना मंगळवारी अटक झाली असून, ४८ तासांपेक्षा जास्त कालावधीत ते पोलीस कोठडीत आहे. ४पोलीस विभागाकडून शिक्षणाधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर शिक्षणाधिकारी हे संस्थाचालकांना संबंधित शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देतील. त्यानंतर अटक असलेल्या शिक्षकांना निलंबनाचा सामना करावा लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.