शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

उद्योगांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती

By | Updated: November 26, 2020 04:12 IST

औरंगाबाद : लॉकडाऊननंतर उद्योगांची विस्कटलेली घडी दिवाळीपासून आता पूर्वपदावर आली आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्यापासून दुसऱ्या ...

औरंगाबाद : लॉकडाऊननंतर उद्योगांची विस्कटलेली घडी दिवाळीपासून आता पूर्वपदावर आली आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्यापासून दुसऱ्या लॉकडाऊनला आणखी सामोरे जावे लागते की काय, अशी भीती उद्योगांमध्ये पसरली आहे. तथापि, गेल्या आठ दिवसांपासून खबरदारीच्या उपाययोजनांची काटकोरपणे अंमलबजावणी करण्याविषयी औरंगाबादच्या उद्योगांना उद्योग संघटनांनी सतर्क केले आहे.

युरोप आणि दिल्लीतील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची आकडेवारी समोर आल्यानंतर उद्योगांमध्ये लॉकडाऊनची चर्चा आणि भीती सुरू झाली. कोरोना महामारीमुळे कधी नव्हे तेवढे उद्योग क्षेत्र बाधित झाले होते. लॉकडाऊनमुळे ऑर्डरचे प्रमाण मंदावले. निर्यात व दळणवळणावर परिणाम झाला. कामगार गावी निघून गेले. उत्पादन क्षमता २५ ते ३० टक्क्यापर्यंत खाली गेली. तब्बल पाच महिने उद्योगांचे अर्थचक्र विस्कळीत झाले. अनलॉकपासून मात्र, उद्योग हळूहळू सावरत गेलेे. दसरा- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण क्षमतेने बाजारपेठा उघडल्या आणि उद्योग हळूहळू पूर्वपदावर आले. लघू- मध्यम व सूक्ष्म उद्योगांची आर्थिक परिस्थिती मात्र, अजूनही बिकट आहे. ऑर्डर आहेत; पण या उद्योगांच्या हातावर पैसा नसल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली, तर लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, अशी भीती उद्योगांमध्ये पसरली आहे. त्यामुळे ‘सीआयआय’ व अन्य उद्योग संघटनांनी औरंगाबादच्या उद्योजकांना धीर देत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उद्योगांमध्ये नियमितपणे कामगार- कर्मचाऱ्यांचे तापमान मोजणे, मास्क अनिवार्य करणे, सॅनिटायजर व फिजिकल डिस्टंसिंग, या बाबींचे कटाक्षाने पालन करण्याविषयी सतर्क करण्यात आले आहे. केवळ उद्योगांमध्येच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी, घरी किंवा बाजारपेठांमध्येही सर्वांनी या उपाययोजनांचे स्वयंस्फूर्तपणे पालन केल्यास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून आपण वाचू शकतो, अशी जागृती करण्यात आली.

चौकट...

सुदैवाने आपण लवकर सावध झालो आहोत

‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आपण सर्वांनीच सजग असले पाहिजे. सुदैवाने यावेळी आपण लवकर सावध झालो आहोत. उद्योग जगताला वाटते की लॉकडाऊन हा शेवटचा उपाय आहे. मात्र, शेवटच्या उपायावर अगोदरच बोलायला पाहिजे, असेही नाही. यासाठी आपण सुरूवातीला जी खबरदारी घ्यायला हवी त्यावरच भर दिला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनियटाझर किंवा हात स्वच्छ धुणे, याचे कटाक्षाने पालन केले पाहिजे. घरी, उद्योग आणि कार्यालयामध्ये लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय उपचार कसा मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. मागील आठवड्यापासून या बाबींवर आम्ही उद्योगांमध्ये भर देत आहोत.