शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

पशुखाद्य महागले !

By admin | Updated: August 6, 2015 00:08 IST

बाळासाहेब जाधव , लातूर गेल्या चार वर्षांपासून पाऊसकाळ कमी झाला आहे. यंदा तर दुष्काळच आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जिल्ह्यावर असून, चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

बाळासाहेब जाधव , लातूरगेल्या चार वर्षांपासून पाऊसकाळ कमी झाला आहे. यंदा तर दुष्काळच आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जिल्ह्यावर असून, चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. ज्वारीच्या कडब्याची पेंढी ५० रुपयाला, तर उसाच्या चार वाड्याची पेंढी ३५ रुपयाला विकली जात आहे. त्यामुळे पशुधन जगवावे कसे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा टाकला आहे.लातूर जिल्ह्यात लहान जनावरांची संख्या १ लाख ४४ हजार ९३२ आहे. तर मोठ्या जनावरांची संख्या ४ लाख ५५ हजार २१८ आहे. लहान-मोठे मिळून ६ लाख १५० पशुधन जिल्ह्यात आहे. सर्वसाधारणपणे लहान जनावरांना प्रतिदिन तीन किलो तर मोठ्या जनावरांना ६ किलो पशुखाद्य ग्राह्य धरले तर दिवसाला एकूण ३ हजार १६६ किलो खाद्य लागते. परंतु, पशुसंवर्धन विभागाकडे आणि शेतकऱ्यांकडे पशुखाद्यच उपलब्ध नाही. त्यामुळे शेजारच्या कर्नाटक राज्यातून आणि नांदेड जिल्ह्यातून वैरण मागविली जात आहे. जिल्ह्यात खाद्य उपलब्ध नसल्याने चढ्या दराने खाद्य उपलब्ध करावे लागत आहे. त्यातच जिल्ह्यात एकही चारा छावणी उभा राहिली नाही. पशुसंवर्धन विभागाने सहकारी संस्थांना चारा छावण्या उभा करण्यासाठी आवाहन केले. मात्र या आवाहनाला अद्याप तरी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. ज्वारीची एक पेंढी ५० रुपयाला, हायब्रीडची २५ रुपयाला, उसाच्या वाड्याची पेंढी ३५ रुपयाला तर हिरव्या मक्याची ४५ रुपयाला पेंढी आहे.जिल्ह्यातील ६ लाख १५० पशुधन जगवायचे असेल, तर ३ कोटी २ लाख रुपये खर्च पशुपालकांना येतो. एक किलोची पेंढ ७५ रुपयाला तर शेकडा कडब्याची पेंढी ५ हजार रुपयाला सध्या खरेदी करावी लागत आहे. या चाऱ्याचा ढोबळ हिशेब लावला तर महिन्याला ३ कोटी २ लाख रुपयांच्या पुढे पशुधन जगविण्यासाठी खर्च करावा लागत आहे. त्यातच चारा छावण्या नाहीत. शासन व प्रशासनाची मदत नाही. त्यामुळे पशुपालकांसमोर मोठ्या अडचणी आल्या आहेत.शेकड्याचा भाव ठरवून वैरण खरेदी केली जात असे. परंतु, आता मोठ्या प्रमाणात वैरणच उपलब्ध नाही. त्यामुळे दहा-पाच कडब्याच्या पेंढ्या खरेदी केल्या जातात. ज्वारीची एक पेंढी ५० रुपये या भावाने मुश्किलीने दहा-पाच पेंढ्या मिळत आहेत.पशुधनाला जगविण्यासाठी दर दिवसाला ३१६६ किलो खाद्य लागते. महिन्याचा विचार केला तर ९४ हजार ९८३ किलो खाद्याची गरज आहे. लातूर तालुक्यासाठी १३ हजार ४४९, औसा १५ हजार २६४, निलंगा १५ हजार १३८, उदगीर ९ हजार ७६७, अहमदपूर १० हजार ९७२, रेणापूर ७ हजार ४९८, चाकूर ९ हजार १४१, शिरूर अनंतपाळ ४ हजार २५९, देवणी ४ हजार २३३, जळकोट ५ हजार २६१ असे एकूण ९४ हजार ९८३ किलो खाद्य दरमहिन्याला लागते. तर वर्षाला ११ लाख ३९ हजार ७७९ किलो खाद्य या पशुधनाला लागणार आहे. परंतु, जिल्ह्यात कोठेही चारा उपलब्ध नाही.