शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

पाण्यासाठी उपोषण

By admin | Updated: March 31, 2015 00:41 IST

खुलताबाद : शहरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दर सातव्या दिवशी पाणीपुरवठा नगर परिषदेकडून केला जात आहे.

खुलताबाद : शहरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दर सातव्या दिवशी पाणीपुरवठा नगर परिषदेकडून केला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी नगर परिषद कार्यालयासमोर नागरिकांनी उपोषण केले.खुलताबादेत मागील अनेक महिन्यांपासून नगर परिषदेतर्फे कधी पाचव्या, तर कधी सातव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यामुळे शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेने पाणीटंचाईची उपाययोजना करून शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, यासाठी अमिनोद्दीन सुलतान मियॉ, माजी नगरसेवक निसारखॉन सरदारखॉन पठाण, मसियोद्दीन अहेमोद्दीन, मोहंमद इसाक इनामदार, कलीमोद्दीन खुदबोद्दीन, अब्बास बेग, अन्वर मोईनोद्दीन, इकबाल गणी पटेल, सय्यद अन्वर अली, सय्यद इसाकोद्दीन, मसीयोद्दीन शरफोद्दीन, इलियास काचवाले, कलीम खुदबोद्दीन, अमीन टेलर आदींनी सोमवारी खुलताबाद नगर परिषदेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनास शहरातील नागरिकांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला.शहराला पाणीपुरवठा करणारा येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. सध्या मध्यम प्रकल्पातील तीन विहिरीतील पाणी एकत्र करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या विहिरीत आडवे, उभे बोअर घेण्यात आल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये प्रकल्पात २० बाय १० चे चर खोदण्यात येईल. यास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने चर खोदण्यामुळे शहराला पाण्याचा फायदा होईल, असे मुख्याधिकारी सविता हारकर म्हणाल्या.