शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

पाण्यासाठी उपोषण

By admin | Updated: March 31, 2015 00:41 IST

खुलताबाद : शहरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दर सातव्या दिवशी पाणीपुरवठा नगर परिषदेकडून केला जात आहे.

खुलताबाद : शहरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दर सातव्या दिवशी पाणीपुरवठा नगर परिषदेकडून केला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी नगर परिषद कार्यालयासमोर नागरिकांनी उपोषण केले.खुलताबादेत मागील अनेक महिन्यांपासून नगर परिषदेतर्फे कधी पाचव्या, तर कधी सातव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यामुळे शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेने पाणीटंचाईची उपाययोजना करून शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, यासाठी अमिनोद्दीन सुलतान मियॉ, माजी नगरसेवक निसारखॉन सरदारखॉन पठाण, मसियोद्दीन अहेमोद्दीन, मोहंमद इसाक इनामदार, कलीमोद्दीन खुदबोद्दीन, अब्बास बेग, अन्वर मोईनोद्दीन, इकबाल गणी पटेल, सय्यद अन्वर अली, सय्यद इसाकोद्दीन, मसीयोद्दीन शरफोद्दीन, इलियास काचवाले, कलीम खुदबोद्दीन, अमीन टेलर आदींनी सोमवारी खुलताबाद नगर परिषदेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनास शहरातील नागरिकांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला.शहराला पाणीपुरवठा करणारा येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. सध्या मध्यम प्रकल्पातील तीन विहिरीतील पाणी एकत्र करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या विहिरीत आडवे, उभे बोअर घेण्यात आल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये प्रकल्पात २० बाय १० चे चर खोदण्यात येईल. यास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने चर खोदण्यामुळे शहराला पाण्याचा फायदा होईल, असे मुख्याधिकारी सविता हारकर म्हणाल्या.