शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शेतकऱ्यांचे थकित पैसे मिळणार

By admin | Updated: August 9, 2014 00:35 IST

उस्मानाबाद : आधारभूत हमीभाव केंद्रावर धान्य दिलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. सदर रक्कम नाफेडने पर्यायाने केंद्र शासनाने उपलब्ध करुन द्यायची होती.

उस्मानाबाद : आधारभूत हमीभाव केंद्रावर धान्य दिलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. सदर रक्कम नाफेडने पर्यायाने केंद्र शासनाने उपलब्ध करुन द्यायची होती. मात्र केंद्राकडून पैसा न आल्याने अखेर शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळणार आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मार्केटींग फेडरेशनमार्फत नाफेडला तूर ३०, ४४१.५० क्विंटल, हरभरा ७५.२८९ क्विंटल दिला होता. त्याची देय रक्कम ३६ कोटी ४२ लाख ९४ हजार ३५० रुपये एवढी होती. त्यातील २५ कोटी ३३ लाख ६३ हजार ३४६ रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र ११ कोटी ९ लाख ३७ हजार रुपये अद्यापही थकीत होते. शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यासाठी नाफेडकडून शेतमालाची रक्कम उपलब्ध होत नसल्याने महाराष्ट्र शासनाने याबाबत पुढाकार घेण्याची विनंती राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती. या अनुषंगाने ८ आॅगस्ट रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. थकीत पैसे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी उभा करावयाच्या ५० कोटीच्या कर्जास शासन हमी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार उपलब्ध झालेल्या हमीचा वापर करुन ५० कोटीचे कर्ज उभे करण्यात येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र स्टेट को आॅप. फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकीत पैसे तातडीने अदा करण्याची मागणी माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी संपर्कमंत्री दिलीप सोपल यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)