शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

शेतकर्‍यांंचे वीजबिल होणार माफ

By admin | Updated: May 24, 2014 00:45 IST

रामेश्वर काकडे, नांदेड गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे वीजबिल शासन माफ करणार आहे.

रामेश्वर काकडे, नांदेड गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे वीजबिल शासन माफ करणार आहे. मात्र यासाठी तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत यादीतील कृषीपंपधारक शेतकर्‍यांनाच वीजबिलमाफीचा लाभ मिळणार असल्याचे महावितरणच्या अधिकृत सूत्राकंडून सांगण्यात आले. जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीपिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे जानेवारी ते जून या कालावधीत वीज देयक शासन अदा करणार आहे़ जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले असून गारपीटग्रस्तांचे जानेवारी ते जून २०१४ या कालावधीतील वीज देयक माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ यासाठी शासनाने २०० कोटींची तरतूद केलेली आहे़ महूसल व कृषी विभागाच्या संयुक्त सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध केलेल्या यादीमधील गारपीटग्रस्तांनाच वीजबीलमाफीचा फायदा मिळणार आहे. बाधित शेतकर्‍यांच्या शेतीपिकावरील कर्जाची परतफेड करण्यास डिसेंबर २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या कालावधीपर्यंत बाधित शेतकर्‍यांकडून सक्तीने कर्ज वसुली करण्यात येणार नाही. ज्या शेतकर्‍यांनी ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत कर्जाची परतफेड केली. अशा शेतकर्‍यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या व्याज अनुदान योजनेनुसार पीक कर्जाची उचल केल्याच्या दिनांकापासून ३६५ दिवसात पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरणार आहेत. ज्या बाधित शेतकर्‍यांनी ३० जून २०१४ पर्यंत पीककर्जाची परतफेड केल्यास अशा शेतकर्‍यांचे नुकसान झालेल्या पिकासाठी घेतलेल्या पीककर्जाच्या परतफेडीच्या दिनांकापर्यंतचे व्याज शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. बाधित शेतकर्‍यांच्या कर्जाचे तीन वर्षांकरिता म्हणजेच सन २०१४-१५, २०१५-१६, १०१६-१७ या कालावधीकरिता शेती पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल. आणि पुनर्गठनाचा पर्याय स्विकारलेल्या शेतकर्‍यांचे पुनर्गठनापूर्वीचे व्याज शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. तहसीलदारांनी पाठविलेल्या अधिकृत यादीतील शेतकर्‍यांनाच वीजबील माफीचा लाभ मिळेल. गारपिटीचे महसूल व कृषी विभागाद्वारे झालेल्या सर्वेक्षणानंतर अंतिम यादी तयार झाली आहे़ यामधील कृषीपंपधारक शेतकर्‍यांना वीज देयक माफीचा लाभ मिळणार असून यादीत नाव नसलेल्या शेतकर्‍यांना वीजदेयके माफीचा लाभ मिळणार नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. बाधित शेतकर्‍यांच्या शेतीपिकावरील कर्जाची परतफेड करण्यास डिसेंबर २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या कालावधीपर्यंत बाधित शेतकर्‍यांकडून सक्तीने कर्जवसुली करण्यात येणार नाही.