शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

शेतकर्‍यांंचे वीजबिल होणार माफ

By admin | Updated: May 24, 2014 00:45 IST

रामेश्वर काकडे, नांदेड गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे वीजबिल शासन माफ करणार आहे.

रामेश्वर काकडे, नांदेड गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे वीजबिल शासन माफ करणार आहे. मात्र यासाठी तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत यादीतील कृषीपंपधारक शेतकर्‍यांनाच वीजबिलमाफीचा लाभ मिळणार असल्याचे महावितरणच्या अधिकृत सूत्राकंडून सांगण्यात आले. जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीपिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे जानेवारी ते जून या कालावधीत वीज देयक शासन अदा करणार आहे़ जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले असून गारपीटग्रस्तांचे जानेवारी ते जून २०१४ या कालावधीतील वीज देयक माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ यासाठी शासनाने २०० कोटींची तरतूद केलेली आहे़ महूसल व कृषी विभागाच्या संयुक्त सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध केलेल्या यादीमधील गारपीटग्रस्तांनाच वीजबीलमाफीचा फायदा मिळणार आहे. बाधित शेतकर्‍यांच्या शेतीपिकावरील कर्जाची परतफेड करण्यास डिसेंबर २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या कालावधीपर्यंत बाधित शेतकर्‍यांकडून सक्तीने कर्ज वसुली करण्यात येणार नाही. ज्या शेतकर्‍यांनी ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत कर्जाची परतफेड केली. अशा शेतकर्‍यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या व्याज अनुदान योजनेनुसार पीक कर्जाची उचल केल्याच्या दिनांकापासून ३६५ दिवसात पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरणार आहेत. ज्या बाधित शेतकर्‍यांनी ३० जून २०१४ पर्यंत पीककर्जाची परतफेड केल्यास अशा शेतकर्‍यांचे नुकसान झालेल्या पिकासाठी घेतलेल्या पीककर्जाच्या परतफेडीच्या दिनांकापर्यंतचे व्याज शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. बाधित शेतकर्‍यांच्या कर्जाचे तीन वर्षांकरिता म्हणजेच सन २०१४-१५, २०१५-१६, १०१६-१७ या कालावधीकरिता शेती पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल. आणि पुनर्गठनाचा पर्याय स्विकारलेल्या शेतकर्‍यांचे पुनर्गठनापूर्वीचे व्याज शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. तहसीलदारांनी पाठविलेल्या अधिकृत यादीतील शेतकर्‍यांनाच वीजबील माफीचा लाभ मिळेल. गारपिटीचे महसूल व कृषी विभागाद्वारे झालेल्या सर्वेक्षणानंतर अंतिम यादी तयार झाली आहे़ यामधील कृषीपंपधारक शेतकर्‍यांना वीज देयक माफीचा लाभ मिळणार असून यादीत नाव नसलेल्या शेतकर्‍यांना वीजदेयके माफीचा लाभ मिळणार नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. बाधित शेतकर्‍यांच्या शेतीपिकावरील कर्जाची परतफेड करण्यास डिसेंबर २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या कालावधीपर्यंत बाधित शेतकर्‍यांकडून सक्तीने कर्जवसुली करण्यात येणार नाही.