शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्य सरकार बेफिकिर

By admin | Updated: August 11, 2014 00:04 IST

परतूर : शेतकऱ्यांची पिके गेली, आत्महत्यांचे प्रमाण वाढले. दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचा आरोप विनोद तावडे यांनी रविवारी येथे केला.

परतूर : शेतकऱ्यांची पिके गेली, आत्महत्यांचे प्रमाण वाढले. दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी येथे केला.परतूर येथे शेतकऱ्यांनी काढलेल्या बैलगाडीसह मोर्चास ते संबोधित करत होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने परतूर विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहिर करण्यासाठी बैलगाडीसह शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बबनराव लोणीकर, भाजयूमोचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दानवे, विजयराव गव्हाणे, जि. प. चे उपाध्यक्ष राहूल लोणीकर, भाऊसाहेब कदम, हरीराम माने, सतीश जाधव हे प्रमुख उपस्थित होते. तावडे पुढे म्हणाले की, राज्यात दुष्काळी परीस्थिती असताना राज्य सरकारला याचे सोयरसुतक नाही, सरकारजवळ दुष्काळावर मात करण्यासाठी कुठलीही ठोस योजना नाही. गारपीट झाली, पिके हातची गेली, जे पिकवलं ते उगवलंच नाही. या राज्य सरकारने महाराष्ट्रावर तीन लाख कोटीचे कर्ज करून ठेवले. फुले, शाहू,आंबेडकर यांचा महाराष्टृ या सरकारने विक्रीला काढला आहे. राज्याची स्थिती वाईट आहे. राज्यात आमचे भाजपा सेना युतीचे सरकार आले तर सर्व आरक्षणाचे प्रश्न सोडवून राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांना जेल दाखवू असा इशाराही तावडे यांनी यावेळी दिला. यावेळी आपल्या प्रास्ताविकात माजी आ. लोणीकर यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर खरमरीत टीका करून मतदारसंघातील प्रश्न मांडले. यावेळी जि. प. सदस्य शहाजी राक्षे, भगवानराव मोरे, बालाजी सांगूळे, मेहराज खतिब, प्रशांत बोनगे, उमाकांत मानवतकर, सह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.