शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्य सरकार बेफिकिर

By admin | Updated: August 11, 2014 00:04 IST

परतूर : शेतकऱ्यांची पिके गेली, आत्महत्यांचे प्रमाण वाढले. दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचा आरोप विनोद तावडे यांनी रविवारी येथे केला.

परतूर : शेतकऱ्यांची पिके गेली, आत्महत्यांचे प्रमाण वाढले. दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी येथे केला.परतूर येथे शेतकऱ्यांनी काढलेल्या बैलगाडीसह मोर्चास ते संबोधित करत होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने परतूर विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहिर करण्यासाठी बैलगाडीसह शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बबनराव लोणीकर, भाजयूमोचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दानवे, विजयराव गव्हाणे, जि. प. चे उपाध्यक्ष राहूल लोणीकर, भाऊसाहेब कदम, हरीराम माने, सतीश जाधव हे प्रमुख उपस्थित होते. तावडे पुढे म्हणाले की, राज्यात दुष्काळी परीस्थिती असताना राज्य सरकारला याचे सोयरसुतक नाही, सरकारजवळ दुष्काळावर मात करण्यासाठी कुठलीही ठोस योजना नाही. गारपीट झाली, पिके हातची गेली, जे पिकवलं ते उगवलंच नाही. या राज्य सरकारने महाराष्ट्रावर तीन लाख कोटीचे कर्ज करून ठेवले. फुले, शाहू,आंबेडकर यांचा महाराष्टृ या सरकारने विक्रीला काढला आहे. राज्याची स्थिती वाईट आहे. राज्यात आमचे भाजपा सेना युतीचे सरकार आले तर सर्व आरक्षणाचे प्रश्न सोडवून राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांना जेल दाखवू असा इशाराही तावडे यांनी यावेळी दिला. यावेळी आपल्या प्रास्ताविकात माजी आ. लोणीकर यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर खरमरीत टीका करून मतदारसंघातील प्रश्न मांडले. यावेळी जि. प. सदस्य शहाजी राक्षे, भगवानराव मोरे, बालाजी सांगूळे, मेहराज खतिब, प्रशांत बोनगे, उमाकांत मानवतकर, सह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.