शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्य सरकार बेफिकिर

By admin | Updated: August 11, 2014 00:04 IST

परतूर : शेतकऱ्यांची पिके गेली, आत्महत्यांचे प्रमाण वाढले. दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचा आरोप विनोद तावडे यांनी रविवारी येथे केला.

परतूर : शेतकऱ्यांची पिके गेली, आत्महत्यांचे प्रमाण वाढले. दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी येथे केला.परतूर येथे शेतकऱ्यांनी काढलेल्या बैलगाडीसह मोर्चास ते संबोधित करत होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने परतूर विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहिर करण्यासाठी बैलगाडीसह शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बबनराव लोणीकर, भाजयूमोचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दानवे, विजयराव गव्हाणे, जि. प. चे उपाध्यक्ष राहूल लोणीकर, भाऊसाहेब कदम, हरीराम माने, सतीश जाधव हे प्रमुख उपस्थित होते. तावडे पुढे म्हणाले की, राज्यात दुष्काळी परीस्थिती असताना राज्य सरकारला याचे सोयरसुतक नाही, सरकारजवळ दुष्काळावर मात करण्यासाठी कुठलीही ठोस योजना नाही. गारपीट झाली, पिके हातची गेली, जे पिकवलं ते उगवलंच नाही. या राज्य सरकारने महाराष्ट्रावर तीन लाख कोटीचे कर्ज करून ठेवले. फुले, शाहू,आंबेडकर यांचा महाराष्टृ या सरकारने विक्रीला काढला आहे. राज्याची स्थिती वाईट आहे. राज्यात आमचे भाजपा सेना युतीचे सरकार आले तर सर्व आरक्षणाचे प्रश्न सोडवून राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांना जेल दाखवू असा इशाराही तावडे यांनी यावेळी दिला. यावेळी आपल्या प्रास्ताविकात माजी आ. लोणीकर यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर खरमरीत टीका करून मतदारसंघातील प्रश्न मांडले. यावेळी जि. प. सदस्य शहाजी राक्षे, भगवानराव मोरे, बालाजी सांगूळे, मेहराज खतिब, प्रशांत बोनगे, उमाकांत मानवतकर, सह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.