शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; बोंड अळी बाधित कपाशीची नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:39 IST

बोंड अळी बाधित कपाशीची हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीकरिता संतप्त शेतकºयांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत अचानक शिरकाव करून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : बोंड अळी बाधित कपाशीची हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीकरिता संतप्त शेतकºयांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत अचानक शिरकाव करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. गंगापूर तालुक्यातील वजनापूर या गावातील सात ते आठ शेतक-यांनी बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर टाकल्याने एकच गोंधळ उडाला.विशेष म्हणजे राज्याचे फलोत्पादन संचालक व येथील पालक संचालक प्रल्हाद पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहानूरमियाँ दर्गा परिसरातील कार्यालयात आढावा बैठक सुरू होती. विभागातील सर्व अधिकारी बैठकीला हजर होते. सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजेदरम्यान जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० शेतकरी घोषणा देत अचानक कार्यालयात आले. शेतकºयांच्या हातात बोंड अळी लागलेले कपाशीचे परदड होते. काही शेतकºयांनी कपाशीच्या बोंडाचे तोरण कार्यालयाला बांधले. ‘ सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’ अशा घोषणा देत सर्वजण थेट बैठकीमध्ये शिरले. प्रल्हाद पोकळेसोबत विभागीय कृषी सहसंचालक प्रताप कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांच्यासमोर संतापलेल्या शेतकºयांनी बाटलीतून आणलेले रॉकेल अंगावर टाकून घेतले. यामुळे एकच गोंधळ उडाला. अधिकाºयांमध्ये धावपळ माजली. यावेळी काही मिनिटांतच पोलीस फाटा घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत शेतकºयांना शांत करण्यात अधिकाºयांना यश आले होते. कपाशीवरील बोंड अळी बाधित शेतकºयांच्या शेताचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी आंदोलनकर्त्यांच्या वतीने संतोष जाधव यांनी मागणी केली. शेतकºयांचा संताप दूर करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी लगेच कृषी आयुक्तांच्या नावे एक पत्र टाईप केले व त्यातील येथील शेतकºयांच्या मागण्या मांडण्यात आल्या. या पत्राची एक प्रत आंदोलनकर्त्या शेतक-यांना देण्यात आली. लेखीपत्र घेऊनच शेतकरी कार्यालयाबाहेर पडले.येत्या आठवडाभरात पंचनामे होणारकपाशीवरील बोंड अळीमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागातर्फे शेतकºयांचे तक्रार अर्ज भरून घेतले जात आहेत. पुढील आठवडाभरात पंचनामेही पूर्ण करण्यात येतील व शासनाला त्याचा अहवाल पाठविण्यात येईल.-प्रल्हाद पोकळे, फलोत्पादन संचालकतथा पालक संचालकहेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावीजिल्ह्यात सुमारे ७५ टक्के कपाशीची लागवड झाली. संपूर्ण कपाशीवर बोंड अळी पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. शेताचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी.-संतोष जाधव, माजी सभापतीअर्थ व बांधकाम (जि. प.)शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार१० एकरात कपाशी लावली होती. अवघी १० क्विंटल कपाशी हातात आली. जिथे ७० ते ८० क्विंटल अपेक्षित होती. बाजारात विक्रीला आणेपर्यंत ६० ते ८० हजारांपर्यंत खर्च आला. ६ हजार भाव पाहिजे होता, पण ४००० ते ४२०० रुपये क्विंटल कपाशी विक्री होत आहे. बोंड अळीने मोठे नुकसान झाले. कपाशीला भाव नाही. सततच्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार.-राजेंद्र चव्हाण,वजनापूर, ता. गंगापूर