शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; बोंड अळी बाधित कपाशीची नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:39 IST

बोंड अळी बाधित कपाशीची हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीकरिता संतप्त शेतकºयांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत अचानक शिरकाव करून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : बोंड अळी बाधित कपाशीची हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीकरिता संतप्त शेतकºयांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत अचानक शिरकाव करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. गंगापूर तालुक्यातील वजनापूर या गावातील सात ते आठ शेतक-यांनी बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर टाकल्याने एकच गोंधळ उडाला.विशेष म्हणजे राज्याचे फलोत्पादन संचालक व येथील पालक संचालक प्रल्हाद पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहानूरमियाँ दर्गा परिसरातील कार्यालयात आढावा बैठक सुरू होती. विभागातील सर्व अधिकारी बैठकीला हजर होते. सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजेदरम्यान जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० शेतकरी घोषणा देत अचानक कार्यालयात आले. शेतकºयांच्या हातात बोंड अळी लागलेले कपाशीचे परदड होते. काही शेतकºयांनी कपाशीच्या बोंडाचे तोरण कार्यालयाला बांधले. ‘ सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’ अशा घोषणा देत सर्वजण थेट बैठकीमध्ये शिरले. प्रल्हाद पोकळेसोबत विभागीय कृषी सहसंचालक प्रताप कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांच्यासमोर संतापलेल्या शेतकºयांनी बाटलीतून आणलेले रॉकेल अंगावर टाकून घेतले. यामुळे एकच गोंधळ उडाला. अधिकाºयांमध्ये धावपळ माजली. यावेळी काही मिनिटांतच पोलीस फाटा घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत शेतकºयांना शांत करण्यात अधिकाºयांना यश आले होते. कपाशीवरील बोंड अळी बाधित शेतकºयांच्या शेताचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी आंदोलनकर्त्यांच्या वतीने संतोष जाधव यांनी मागणी केली. शेतकºयांचा संताप दूर करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी लगेच कृषी आयुक्तांच्या नावे एक पत्र टाईप केले व त्यातील येथील शेतकºयांच्या मागण्या मांडण्यात आल्या. या पत्राची एक प्रत आंदोलनकर्त्या शेतक-यांना देण्यात आली. लेखीपत्र घेऊनच शेतकरी कार्यालयाबाहेर पडले.येत्या आठवडाभरात पंचनामे होणारकपाशीवरील बोंड अळीमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागातर्फे शेतकºयांचे तक्रार अर्ज भरून घेतले जात आहेत. पुढील आठवडाभरात पंचनामेही पूर्ण करण्यात येतील व शासनाला त्याचा अहवाल पाठविण्यात येईल.-प्रल्हाद पोकळे, फलोत्पादन संचालकतथा पालक संचालकहेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावीजिल्ह्यात सुमारे ७५ टक्के कपाशीची लागवड झाली. संपूर्ण कपाशीवर बोंड अळी पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. शेताचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी.-संतोष जाधव, माजी सभापतीअर्थ व बांधकाम (जि. प.)शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार१० एकरात कपाशी लावली होती. अवघी १० क्विंटल कपाशी हातात आली. जिथे ७० ते ८० क्विंटल अपेक्षित होती. बाजारात विक्रीला आणेपर्यंत ६० ते ८० हजारांपर्यंत खर्च आला. ६ हजार भाव पाहिजे होता, पण ४००० ते ४२०० रुपये क्विंटल कपाशी विक्री होत आहे. बोंड अळीने मोठे नुकसान झाले. कपाशीला भाव नाही. सततच्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार.-राजेंद्र चव्हाण,वजनापूर, ता. गंगापूर