शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

शेतक ऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी

By admin | Updated: July 24, 2014 00:14 IST

तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात २३ जुलै २०१३ रोजी सकाळी १0 ते रात्री ११ अशा तब्बल १३ तासांत ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात २३ जुलै २०१३ रोजी सकाळी १0 ते रात्री ११ अशा तब्बल १३ तासांत ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला होता. वर्ष उलटल्यानंतरही अतोनात नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर काहींना तुटपुंजी मदत मिळाली.नदी-नाल्यांच्या काठावरील शेतांमधून पूर गेल्याने जमिनीसह खरीप पिके वाहून गेली होती. तर अनेकांची घरे पडली होती. व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुक सान झाले होते. मंठा ते लोणार रोडवरील वडगाव (सं) येथील सरस्वती नदीला पूर आल्याने सायंकाळी ६ वाजेपासून तर रात्री ३ वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. एका रात्रीतून शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले होते. अतिवृष्टीला एक वर्ष पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांचा डोळ््यांत आजही पाणी येत आहे. मागील वर्षीही यावर्षीप्रमाणे तळणी मंडळात मोठा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र २३ जुलै रोजी मुसळधार पावसाने तळणीसह परिसरातील सर्वच तलाव ओव्हर फ्लो झाले होते. आईचा तलाव तुडुंब भरु न फु टण्याचा मार्गावर होता. भीतीने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. पाझर तलाव गट क्र .७२६ मधील तलाव क्र . १० रात्री फु टल्याने शेकडो हेक्टर जमिनीतून पूर गेल्याने जमिनी खरडून खरिपाची पिके वाहून गेली. तर शेतोपयोगी साहित्य, नेट-शेड, ठिबक संच, पाईप वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. वडगाव (सं) येथील सरस्वती नदीला पूर आल्याने अर्ध्या गावात पाणी शिरले होते. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. तर नदीला पूर आल्याने सायंकाळी ६ वाजेपासून लोणार व मंठ्याक डे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. रात्री ११ वाजता पाऊस थांबल्यामुळे ३ वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. वाघाळा, देवढाणा, कोकंरबा या गावाक डे जाण्याऱ्या नाल्यांना पूर गेला. प्रथमच तळणी मंडळात ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. अनेक लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या. मदतीचे आश्वासन दिले. मात्र अनेकांना तुटपुंजी मदत मिळाली तर अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. एका रात्रीतून शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले होते. एका वर्षानंतरही शेतकरी त्या अतिवृष्टीतून सावरलेला नाही. आठवण येताच डोळ्यात पाणी येत असल्याचे पूरग्रस्त शेतकरी मांगीलाल चव्हाण, शिवाजी गुजर, ज्ञानेश्वर सरक टे, लक्ष्मण राऊत, मीराबाई गत्ते, कैलास पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)