शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

शेतकऱ्यांनो, रब्बीची पेरणी केली; आता १ रुपयात पिकांना द्या विमा कवच, अर्ज प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 18:20 IST

नैसर्गिक आपत्तीत मिळेल संरक्षण; रब्बी हंगामातही प्रतिअर्ज एक रुपयात पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

गंगापूर : खरीपप्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ एक रुपयात पीक विमा भरता येणार आहे. नैसर्गिक आपत्तीत पिकांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांची पेरणी केली असल्यास अशा शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे आवश्यक आहे.

राज्य शासनाने जून २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामातही प्रतिअर्ज एक रुपयात पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकतेप्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. पीकविमा योजना अधिसूचित पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहणार आहे. तालुक्यात रब्बी गहू बागायती, हरभरा, रब्बी कांदा, ज्वारी ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. रब्बी हंगामासाठी पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी कांदा, गहू, हरभऱ्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १५ डिसेंबरची, तर ज्वारीची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाकडून गावस्तरावर जनजागृती केली जात आहे.

ऑनलाइनही भरता येईल अर्जपीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज करता यावा, यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचीदेखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. pmfby पोर्टल तसेच https//pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्रामार्फत अर्ज करता येतो.

अर्ज प्रक्रिया सुरूखरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असते. रब्बीचे क्षेत्र कमी असल्यानेच पीकविमा योजनेत सहभागी शेतकरीही कमी असतात. गतवर्षी रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीचे काही सांगता येत नसल्याने हंगामातील पिकांना विमा संरक्षण देणे आवश्यक असते. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभाग व विमा कंपनीने केले आहे.

मुदतीपूर्वी विमा भरावापिकांना विमा संरक्षण असल्यास नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडे मोबदला मागता येतो. त्यासाठी रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतीपूर्वी अर्ज करून पिकांना विमा कवच द्यावे, असे आवाहन कृषी विभाग व विमा कंपनीकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर