शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

शेतकऱ्यांनो, रब्बीची पेरणी केली; आता १ रुपयात पिकांना द्या विमा कवच, अर्ज प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 18:20 IST

नैसर्गिक आपत्तीत मिळेल संरक्षण; रब्बी हंगामातही प्रतिअर्ज एक रुपयात पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

गंगापूर : खरीपप्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ एक रुपयात पीक विमा भरता येणार आहे. नैसर्गिक आपत्तीत पिकांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांची पेरणी केली असल्यास अशा शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे आवश्यक आहे.

राज्य शासनाने जून २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामातही प्रतिअर्ज एक रुपयात पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकतेप्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. पीकविमा योजना अधिसूचित पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहणार आहे. तालुक्यात रब्बी गहू बागायती, हरभरा, रब्बी कांदा, ज्वारी ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. रब्बी हंगामासाठी पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी कांदा, गहू, हरभऱ्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १५ डिसेंबरची, तर ज्वारीची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाकडून गावस्तरावर जनजागृती केली जात आहे.

ऑनलाइनही भरता येईल अर्जपीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज करता यावा, यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचीदेखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. pmfby पोर्टल तसेच https//pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्रामार्फत अर्ज करता येतो.

अर्ज प्रक्रिया सुरूखरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असते. रब्बीचे क्षेत्र कमी असल्यानेच पीकविमा योजनेत सहभागी शेतकरीही कमी असतात. गतवर्षी रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीचे काही सांगता येत नसल्याने हंगामातील पिकांना विमा संरक्षण देणे आवश्यक असते. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभाग व विमा कंपनीने केले आहे.

मुदतीपूर्वी विमा भरावापिकांना विमा संरक्षण असल्यास नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडे मोबदला मागता येतो. त्यासाठी रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतीपूर्वी अर्ज करून पिकांना विमा कवच द्यावे, असे आवाहन कृषी विभाग व विमा कंपनीकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर