शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शेतकऱ्यांनो, रब्बीची पेरणी केली; आता १ रुपयात पिकांना द्या विमा कवच, अर्ज प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 18:20 IST

नैसर्गिक आपत्तीत मिळेल संरक्षण; रब्बी हंगामातही प्रतिअर्ज एक रुपयात पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

गंगापूर : खरीपप्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ एक रुपयात पीक विमा भरता येणार आहे. नैसर्गिक आपत्तीत पिकांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांची पेरणी केली असल्यास अशा शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे आवश्यक आहे.

राज्य शासनाने जून २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामातही प्रतिअर्ज एक रुपयात पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकतेप्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. पीकविमा योजना अधिसूचित पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहणार आहे. तालुक्यात रब्बी गहू बागायती, हरभरा, रब्बी कांदा, ज्वारी ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. रब्बी हंगामासाठी पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी कांदा, गहू, हरभऱ्याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १५ डिसेंबरची, तर ज्वारीची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाकडून गावस्तरावर जनजागृती केली जात आहे.

ऑनलाइनही भरता येईल अर्जपीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज करता यावा, यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचीदेखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. pmfby पोर्टल तसेच https//pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्रामार्फत अर्ज करता येतो.

अर्ज प्रक्रिया सुरूखरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असते. रब्बीचे क्षेत्र कमी असल्यानेच पीकविमा योजनेत सहभागी शेतकरीही कमी असतात. गतवर्षी रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीचे काही सांगता येत नसल्याने हंगामातील पिकांना विमा संरक्षण देणे आवश्यक असते. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभाग व विमा कंपनीने केले आहे.

मुदतीपूर्वी विमा भरावापिकांना विमा संरक्षण असल्यास नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडे मोबदला मागता येतो. त्यासाठी रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतीपूर्वी अर्ज करून पिकांना विमा कवच द्यावे, असे आवाहन कृषी विभाग व विमा कंपनीकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर