शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

नांदरच्या तलाठी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:03 IST

दावरवाडी : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान अद्यापपर्यंत प्राप्त झाले नाही, ते अनुदान त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी पैठण तालुक्यातील ...

दावरवाडी : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान अद्यापपर्यंत प्राप्त झाले नाही, ते अनुदान त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी पैठण तालुक्यातील नांदरच्या तलाठी कार्यालयासमोर गुरुवारी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर तलाठ्यांना निवेदन देण्यात आले.

ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात संततधार पाऊस आणि त्यांनतर जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला. सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर पंचनामे करण्यात आली. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासित केले. मात्र, दिवाळी गेली आणि आता नवीन वर्षाला सुरुवातही झाली. तरीदेखील काही शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी पैठण तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेले शेतकरी आक्रमक झाले आहेत. हातात बॅनर घेऊन शासनाचा निषेध नोंदविला. अचानक झालेल्या या ठिय्या आंदोलनामुळे शेतकरी नांदर तलाठी कार्यालयासमोर गर्दी जमली होती. यावेळी मंडळ अधिकारी जी. सी. माळी, तलाठी आर. पी. सोनवणे यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या वतीने दिलेले लेखीपत्र आंदोलक शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिय्या मागे घेऊन त्वरित अनुदान मिळाले नाही, तर भविष्यात तहसील कार्यालयात ठिय्या दिला जाईल, असा इशारा दिला.

फोटो : मंडळ अधिकारी जी. सी. माळी, तलाठी आर. पी. सोनवणे यांना निवेदन देताना दावरवाडी शिवारातील शेतकरी.