शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी सज्ज

By admin | Updated: June 24, 2014 00:33 IST

रमेश शिंदे , औसा ८ जूनला मृग नक्षत्राची सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस आज पडेल, उद्या पडेल या अपेक्षेने शेतकरी दररोज वरुणराजाच्या हजेरीकडे डोळे लावून बसला आहे.

रमेश शिंदे , औसा८ जूनला मृग नक्षत्राची सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस आज पडेल, उद्या पडेल या अपेक्षेने शेतकरी दररोज वरुणराजाच्या हजेरीकडे डोळे लावून बसला आहे. मृग नक्षत्राचे १५ दिवस उलटले, परंतु पाऊस मात्र आलाच नाही. सोमवारी आर्द्रा नक्षत्राची सुरुवात झाली. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी राजा मोठ्या पावसाची वाट पाहत काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला आहे.औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. १ लाख २१ हजार ७२० हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ९ लाख क्षेत्रावर खरिपाची पेरणी होते. मागील चार-पाच वर्षांपासून खरीप हंगामासाठी वेळेवर पाऊस न पडणे, पेरण्या झाल्यानंतरही पावसात खंड पडणे, झालाच तर जास्तीचा पाऊस होणे आणि तोही पिके काढणीला आल्यानंतर, अशी परिस्थिती असते. त्यामुळे औसा तालुक्यातील शेतकरी आणि शेती व्यवसाय कोलमडून पडला आहे. किमान यावर्षी तरी चांगला पाऊस पडेल आणि मृग नक्षत्रात वेळेवर पेरण्या होतील. मागील चार-पाच वर्षांपासून झालेली शेती व्यवसायाची वाताहत थांबेल, अशी आशा शेतकरी बाळगून होता; परंतु या सर्वच अपेक्षावर मृग नक्षत्राने पाणी फेरले आहे. मृग नक्षत्रच कोरडे गेल्यामुळे आता शेतकऱ्यांची आशा आर्द्रा नक्षत्रावर आहे. मागील वर्षी अर्ध्या तालुक्यात पेरणीसाठी वेळेवर पाऊस झाला होता. अर्ध्या तालुक्यात मात्र पावसाच्या विलंबामुळे पेरण्याही उशिराच झाल्या. मध्येच पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगाम म्हणावा तसा शेतकऱ्यांच्या हाती लागला नाही. त्यानंतर रबी हंगाम हाता-तोंडाशी आल्यानंतर गारपिटीने उद्ध्वस्त केला. त्यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. तरीही शेतकरी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी नव्या उत्साहाने सज्ज झाला आहे. परंतु, मृग नक्षत्र कोरडेच गेला असून, आर्द्रा नक्षत्रातही पावसाची काय परिस्थिती राहील, याच चिंतेत शेतकरी दिसून येत आहेत.निसर्गाचा लहरीपणा...निसर्ग लहरी बनला असून, आता शेती करणे नको वाटत आहे. कारण शेतामध्ये केलेला खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ लागत नाही. कधी कधी तर उत्पन्न कमी आणि खर्च अधिक, अशी अवस्था होत आहे. त्यामुळे या अल्पश: उत्पादनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे, अशी प्रतिक्रिया गणेश सूर्यवंशी, विकास कदम, राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यांनी दिली आहे.