शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी सज्ज

By admin | Updated: June 24, 2014 00:33 IST

रमेश शिंदे , औसा ८ जूनला मृग नक्षत्राची सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस आज पडेल, उद्या पडेल या अपेक्षेने शेतकरी दररोज वरुणराजाच्या हजेरीकडे डोळे लावून बसला आहे.

रमेश शिंदे , औसा८ जूनला मृग नक्षत्राची सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस आज पडेल, उद्या पडेल या अपेक्षेने शेतकरी दररोज वरुणराजाच्या हजेरीकडे डोळे लावून बसला आहे. मृग नक्षत्राचे १५ दिवस उलटले, परंतु पाऊस मात्र आलाच नाही. सोमवारी आर्द्रा नक्षत्राची सुरुवात झाली. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी राजा मोठ्या पावसाची वाट पाहत काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला आहे.औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. १ लाख २१ हजार ७२० हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ९ लाख क्षेत्रावर खरिपाची पेरणी होते. मागील चार-पाच वर्षांपासून खरीप हंगामासाठी वेळेवर पाऊस न पडणे, पेरण्या झाल्यानंतरही पावसात खंड पडणे, झालाच तर जास्तीचा पाऊस होणे आणि तोही पिके काढणीला आल्यानंतर, अशी परिस्थिती असते. त्यामुळे औसा तालुक्यातील शेतकरी आणि शेती व्यवसाय कोलमडून पडला आहे. किमान यावर्षी तरी चांगला पाऊस पडेल आणि मृग नक्षत्रात वेळेवर पेरण्या होतील. मागील चार-पाच वर्षांपासून झालेली शेती व्यवसायाची वाताहत थांबेल, अशी आशा शेतकरी बाळगून होता; परंतु या सर्वच अपेक्षावर मृग नक्षत्राने पाणी फेरले आहे. मृग नक्षत्रच कोरडे गेल्यामुळे आता शेतकऱ्यांची आशा आर्द्रा नक्षत्रावर आहे. मागील वर्षी अर्ध्या तालुक्यात पेरणीसाठी वेळेवर पाऊस झाला होता. अर्ध्या तालुक्यात मात्र पावसाच्या विलंबामुळे पेरण्याही उशिराच झाल्या. मध्येच पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगाम म्हणावा तसा शेतकऱ्यांच्या हाती लागला नाही. त्यानंतर रबी हंगाम हाता-तोंडाशी आल्यानंतर गारपिटीने उद्ध्वस्त केला. त्यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. तरीही शेतकरी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी नव्या उत्साहाने सज्ज झाला आहे. परंतु, मृग नक्षत्र कोरडेच गेला असून, आर्द्रा नक्षत्रातही पावसाची काय परिस्थिती राहील, याच चिंतेत शेतकरी दिसून येत आहेत.निसर्गाचा लहरीपणा...निसर्ग लहरी बनला असून, आता शेती करणे नको वाटत आहे. कारण शेतामध्ये केलेला खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ लागत नाही. कधी कधी तर उत्पन्न कमी आणि खर्च अधिक, अशी अवस्था होत आहे. त्यामुळे या अल्पश: उत्पादनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे, अशी प्रतिक्रिया गणेश सूर्यवंशी, विकास कदम, राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यांनी दिली आहे.