शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेतकऱ्यांकडील कापूस संपला आणि दर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:05 IST

बाजारसावंगी : शेतकरी कापूस विकून मोकळे झाले असून केवळ व्यापाऱ्यांकडे कापसाचे स्टॉक शिल्लक आहेत आणि आता कापसाच्या दरात ...

बाजारसावंगी : शेतकरी कापूस विकून मोकळे झाले असून केवळ व्यापाऱ्यांकडे कापसाचे स्टॉक शिल्लक आहेत आणि आता कापसाच्या दरात आठशे ते नऊशे रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी केलेल्या कापसामुळे व्यापारी मालामाल होणार असून शेतकरी मात्र आहे त्या अवस्थेतच राहणार असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

बाजारसावंगी, दरेगाव, पाडळी, ताजनापूर, शिरोडी, येसगाव, जानेफळ, ममुराबादवाडी या परिसरातील कापूस हा लांब धाग्याचा असून इतर भागातील कापसापेक्षा या कापसास जास्तीचा भाव मिळतो. परिसरातील शेतकऱ्यांकडे असलेला कापूस त्यांनी नोव्हेंबर महिन्यातच चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शिल्लक होता, त्यांनी डिसेंबर महिन्यात पाच हजार रुपये भाव झाल्यानंतर विकून टाकला. त्यामुळे जवळपास शेतकऱ्यांचा कापूस संपलेला असून आता केवळ व्यापाऱ्यांकडे कापसाचे स्टॉक शिल्लक आहेत. आता मात्र, कापसाचे दर आठशे ते नऊशे रुपयांनी वाढले असून पाच हजार आठशे ते पाच हजार नऊशे झाल्याचे दिसत असून शेतकरी मात्र हात चाेळत बसले आहेत. हे नेहमीचेच असून यात व्यापाऱ्यांचे मात्र चांगलेच फावत आहे.

चौकट

मक्याचे भाव कमीच

शासनाने मक्याचे भाव अठराशे पन्नास रुपये केलेले आहेत. मात्र बाजारात यापेक्षा कमी भावाने मका खरेदी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मक्याला चौदाशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता, तो आणखी कमी झाला असून तो एक हजार ते अकराशेपर्यंत गडगडला आो. शासकीय खरेदी केंद्रावर गर्दीमुळे शेतकऱ्यांना विक्रीसाठी अडचणी येत आहेत. यामुळे व्यापारी कमी भावात खरेदी करीत आहेत.