शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

शेतकऱ्यांनी केली संकटावर मात

By admin | Updated: December 11, 2014 00:42 IST

माधव शिंदे, मसलगा यंदाच्या अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतकरी धास्तावला असतानाही मसलगा येथील पाच शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने संकटावर मात करणार

माधव शिंदे, मसलगायंदाच्या अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतकरी धास्तावला असतानाही मसलगा येथील पाच शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने संकटावर मात करणार असा निर्धार करीत अत्यल्प पाण्यावर अत्याधुनिक पद्धतीने मलचिंग पेपरवरील मिरची लागवड करुन नैराश्यात जगणाऱ्या शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्नच सुरु केला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांत चर्चा सुरु आहे़निलंगा तालुक्यातील मसलगा येथील तुळशीदास साळुंके, दत्ता जाधव, ज्ञानेश्वर आरेराव, गोविंद जाधव, बापूराव जाधव आदी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकी एक एकर याप्रमाणे पाच एकर शेतीवर मिरची लागवड नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केली आहे़ जमिनीपासून १ फूट उंचीचे बेड तयार करुन त्यावर प्रथम ठिबक अंथरले़ त्यावर मलचिंग पेपरचे अच्छादन केले़ दीड बाय दीड फुट असे अंतर ठेऊन मिरचीची लागवड केली आहे़ एका एकरसाठी ४ हजार रोपे लागली आहेत़ आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केल्याने उत्पन्न चांगले मिळेल अशी आशा आहे़ अल्प पावसामुळे यंदा हातचे खरीप गेले़ रबीची पेरणी झाली़ परंतु, ती उगवत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ परिणामी, चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे़ दुष्काळी परिस्थितीत होरपळ होत असल्याने काही शेतकरी आत्महत्येसारख्या मार्गाकडे वळत आहेत़ परंतु, शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता धैर्याने संकटाचा सामना करावा़ शेतातील उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करुन उत्पादन घ्यावे, असा संदेशच या शेतकऱ्यांनी दिला आहे़ सध्या सगळीकडेच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या या नवीन प्रयोगाने अन्य शेतकऱ्यांनाही उत्साह येणार आहे़ या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक डी़ एल़ कळसे हे मार्गदर्शन करीत आहेत़ ४माझ्याकडे पाच एकर ऊस आहे़ त्यातील एक एकर ऊस मोडून आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केली आहे़ उर्वरित ऊस क्षेत्रही मोडित काढून अल्प पजर्न्यावरची पीके घेणार असल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर आरेराव यांनी सांगितले़४कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन मिळविणे व कमी पाण्यावर येणारे पीक असल्याने आपणही मिरचीची लागवड केली असल्याचे शेतकरी बापूराव जाधव यांनी सांगितले़४माझे शेतशेजारी ज्ञानेश्वर आरेराव यांनी पाणी देऊ केल्याने आपल्याकडे असलेला ऊस मोडित काढून मिरची व टोमॅटो लागवड करीत असल्याचे सचिन आरेराव यांनी सांगितले़ ४गेल्या दोन - तीन वर्षांपासून आपण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले असून, यामध्ये कलकत्ता पान, केळी, टोमॅटो, टरबूज आदींचे उत्पन्न घेतल्याचे शेतकरी तुळशीदास साळूंके म्हणाले़