शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

शेतकऱ्यांनी केली संकटावर मात

By admin | Updated: December 11, 2014 00:42 IST

माधव शिंदे, मसलगा यंदाच्या अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतकरी धास्तावला असतानाही मसलगा येथील पाच शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने संकटावर मात करणार

माधव शिंदे, मसलगायंदाच्या अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतकरी धास्तावला असतानाही मसलगा येथील पाच शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने संकटावर मात करणार असा निर्धार करीत अत्यल्प पाण्यावर अत्याधुनिक पद्धतीने मलचिंग पेपरवरील मिरची लागवड करुन नैराश्यात जगणाऱ्या शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्नच सुरु केला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांत चर्चा सुरु आहे़निलंगा तालुक्यातील मसलगा येथील तुळशीदास साळुंके, दत्ता जाधव, ज्ञानेश्वर आरेराव, गोविंद जाधव, बापूराव जाधव आदी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकी एक एकर याप्रमाणे पाच एकर शेतीवर मिरची लागवड नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केली आहे़ जमिनीपासून १ फूट उंचीचे बेड तयार करुन त्यावर प्रथम ठिबक अंथरले़ त्यावर मलचिंग पेपरचे अच्छादन केले़ दीड बाय दीड फुट असे अंतर ठेऊन मिरचीची लागवड केली आहे़ एका एकरसाठी ४ हजार रोपे लागली आहेत़ आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केल्याने उत्पन्न चांगले मिळेल अशी आशा आहे़ अल्प पावसामुळे यंदा हातचे खरीप गेले़ रबीची पेरणी झाली़ परंतु, ती उगवत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ परिणामी, चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे़ दुष्काळी परिस्थितीत होरपळ होत असल्याने काही शेतकरी आत्महत्येसारख्या मार्गाकडे वळत आहेत़ परंतु, शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता धैर्याने संकटाचा सामना करावा़ शेतातील उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करुन उत्पादन घ्यावे, असा संदेशच या शेतकऱ्यांनी दिला आहे़ सध्या सगळीकडेच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या या नवीन प्रयोगाने अन्य शेतकऱ्यांनाही उत्साह येणार आहे़ या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक डी़ एल़ कळसे हे मार्गदर्शन करीत आहेत़ ४माझ्याकडे पाच एकर ऊस आहे़ त्यातील एक एकर ऊस मोडून आधुनिक पद्धतीने मिरची लागवड केली आहे़ उर्वरित ऊस क्षेत्रही मोडित काढून अल्प पजर्न्यावरची पीके घेणार असल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर आरेराव यांनी सांगितले़४कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन मिळविणे व कमी पाण्यावर येणारे पीक असल्याने आपणही मिरचीची लागवड केली असल्याचे शेतकरी बापूराव जाधव यांनी सांगितले़४माझे शेतशेजारी ज्ञानेश्वर आरेराव यांनी पाणी देऊ केल्याने आपल्याकडे असलेला ऊस मोडित काढून मिरची व टोमॅटो लागवड करीत असल्याचे सचिन आरेराव यांनी सांगितले़ ४गेल्या दोन - तीन वर्षांपासून आपण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले असून, यामध्ये कलकत्ता पान, केळी, टोमॅटो, टरबूज आदींचे उत्पन्न घेतल्याचे शेतकरी तुळशीदास साळूंके म्हणाले़