शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे बिघडले शेतकर्‍यांचे गणित

By admin | Updated: May 23, 2014 01:10 IST

परभणी : यावर्षी जिल्ह्यात अकराही महिने पाऊस झाला. या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. पावसामुळे रबी हंगामाची पूर्णत: नासाडी झाली

 परभणी : यावर्षी जिल्ह्यात अकराही महिने पाऊस झाला. या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. पावसामुळे रबी हंगामाची पूर्णत: नासाडी झाली असून शेतकर्‍यांचे सर्व गणिते या बिघडविले आहेत. शेती व्यवसायाला बेभरोशाचा व्यवसाय संबोधले जाते. निसर्गावर आधारित असलेला हा कृषी व्यवसाय आतापर्यंत पावसाच्या बेभरवशामुळे संकटात येत होता. यावर्षी मात्र अवकाळी पावसानेच या कृषी व्यवसायावर नांगर फिरविले आहेत. मागील वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांच्या रबी हंगामावर मोठ्या आशा होत्या. परंतु, मार्च, एप्रिल या महिन्यात अवकाळी पावसाबरोबरच गारपीटही झाली. या संकटात जिल्ह्यातील रबी पिकांचे नुकसान झाले. यावर्षी पाच लाख हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. अवकाळी पावसामुळे अर्ध्याअधिक रबीचे क्षेत्र नुकसानग्रस्त झाले. विशेष म्हणजे रबीचे पिके काढणीला आली होती आणि त्यापूर्वीच अवकाळी पावसाने दगा दिला. या संकटातून शेतकरी अजूनही सावरलेला नाही. (प्रतिनिधी)परभणी जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८५० मि.मी. एवढी आहे. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता सरासरी देखील कशी-बशी पूर्ण होते. परंतु, मागच्या पावसाळी हंगामात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जून ते डिेसेंबर २०१३ या महिन्यांमध्ये १ हजार १७२.६ मि.मी. पाऊस झाला आहे. तर जानेवारी ते डिसेंबर या काळात १२१६.१ मि.मी. पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याचे दिवस वगळता जानेवारी २०१४ ते मे २०१४ या काळात १२९.५० मि.मी. एवढा अवकाळी पाऊस झाला. पावसाळी हंगामामध्ये सरासरी ३० ते ३५ दिवस हे पावसाचे असतात. परंतु, यावर्षीच्या पावसाळ्यात मात्र ६१ दिवस पावसाचे राहिले. तर जानेवारी ते डिसेंबर या संपूर्ण वर्षामध्ये ६५ दिवस पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०१४ ते मे २०१४ या पाच महिन्यांमध्ये दहा दिवस पाऊस झाला. या काळात १२९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली.