शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

शेतकºयांची थट्टा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:46 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलैची मुदत संपल्यानंतर शासनाने मंगळवारी सायंकाळी ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीचे आदेश बँकांना पाठविले़, परंतु रात्री उशिरा पीक विम्यासंदर्भात आणखी एक आदेश धडकला़ त्यामध्ये बिगर कर्जदार शेतकºयांना सेतू केंद्रात पीक विमा काढण्याचे नमूद होते़ त्यामुळे बुधवारीही बँकांनी पीक विमा स्वीकारला नसून बँक आणि सेतूच्या फेºयात अडकलेल्या शेतकºयांची अशाप्रकारे शासनाकडून थट्टाच सुरु आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलैची मुदत संपल्यानंतर शासनाने मंगळवारी सायंकाळी ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीचे आदेश बँकांना पाठविले़, परंतु रात्री उशिरा पीक विम्यासंदर्भात आणखी एक आदेश धडकला़ त्यामध्ये बिगर कर्जदार शेतकºयांना सेतू केंद्रात पीक विमा काढण्याचे नमूद होते़ त्यामुळे बुधवारीही बँकांनी पीक विमा स्वीकारला नसून बँक आणि सेतूच्या फेºयात अडकलेल्या शेतकºयांची अशाप्रकारे शासनाकडून थट्टाच सुरु आहे़३१ जुलै ही पीक विमा स्वीकारण्याची अंतिम तारीख असल्यामुळे जिल्ह्यातील सेतू केंद्र आणि बँकांबाहेर हजारो शेतकºयांनी उन्हातान्हात रांगेत लागून पीक विमा भरला़ अनेक तालुक्यांतील शेतकºयांना तर पीक विम्यासाठी जागरण करावे लागले़ नागपंचमी सणाच्या दिवशीही शेतकरी दिवसभर बँकांच्याच रांगेत होते़ ३१ जुलैच्या रात्रीपर्यंत जिल्ह्यात जवळपास चार लाख शेतकºयांनी पीक विमा भरला होता़ मुदत संपल्यामुळे तब्बल ३ लाख ७० हजारांवर शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यात ३१ जुलैच्या रात्री शासनाने पीक विम्यासाठी ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली़ त्यामुळे अनेक शेतकºयांचा जीव भांड्यात पडला होता़ शासनाच्या घोषणेनुसार १ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात बँकांमध्ये पीक विमा काढण्यासाठी शेतकरी गेले, परंतु सायंकाळपर्यंत मुदतवाढीचे आदेशच बँकांना मिळाले नव्हते़ त्यामुळे काही ठिकाणी बँकेचे अधिकारी आणि शेतकºयांमध्ये वादाच्या घटना घडल्या़सायंकाळी बँका बंद झाल्यानंतर मुदतवाढीचे आदेश धडकले़ त्यामुळे मुदतवाढीच्या पहिल्या दिवशी एकाही शेतकºयाचा पीक विमा उतरविण्यात आला नाही़ सायंकाळी आलेल्या आदेशानंतर बँकांनी बुधवारपासून पीक विमा काढण्याचे नियोजन केले होते, परंतु रात्री उशिरा आणखी एक नवाच आदेश धडकला़ त्यामध्ये ही मुदतवाढ केवळ बिगर कर्जदार शेतकºयांसाठीच देण्यात आली असून आॅनलाईन पद्धतीत जनसुविधा केंद्राच्या माध्यमातूनच भरण्यात येतील़शेतकºयाकडील पीक पेरणी प्रमाणपत्र ३१ जुलै २०१७ अथवा त्यापूर्वीचा असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले़ तसेच वाढीव मुदतीत भरलेल्या अर्जाची माहिती स्वतंत्रपणे ठेवण्यास सांगण्यात आले आहे़ तसेच यापूर्वी दिलेल्या आदेशात ५ आॅगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती़ नव्या आदेशात मात्र ती ४ आॅगस्टपर्यंतच दाखविण्यात आली आहे़ त्यामुळे पहिला दिवस निरंक, दुसरा दिवस गोंधळात गेल्यानंतर आता साडेतीन लाखांवर शेतकºयांना पीक विमा भरण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत़