शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

भू-विकास बँकेकडे शेतकऱ्यांचे हेलपाटे

By admin | Updated: June 18, 2014 01:28 IST

बिलोली : अठरा वर्षापासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असलेल्या भू-विकास बँकेकडे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बिलोली शाखेकडे हेलपाटे सुरू झाले आहेत़

बिलोली : अठरा वर्षापासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असलेल्या भू-विकास बँकेकडे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बिलोली शाखेकडे हेलपाटे सुरू झाले आहेत़ दरम्यान, बिलोली, धर्माबाद, उमरी व नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बिलोलीत पायपीट करावी लागत आहे़ एकाच बँक कर्मचाऱ्यावर भार असून ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत़शेतकऱ्यांची बँक म्हणून भू-विकास बँक परिचित होती़ पण बुडीत कर्जामुळे बँकेचे दिवाळे निघाले़ सन १९९६ मध्ये बँकेचे संपूर्ण व्यवहार बंद झाले़ पीक कर्ज देण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बँका सरसावल्यामुळे भू-विकास बँकेचे महत्त्व घटले व ही बँक केवळ नावाकरिता उरली़ पण शेती कर्जासाठी या बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नवीन कर्जधारकांना बँकेकडे हेलपाटे मारावे लागत आहेत़बिलोली, नायगाव व धर्माबादसह उमरी तालुक्यातील जवळपास २५० गावांसाठी बिलोलीची भू-विकास बँक होती़ परिणामी अशा गावातील शेतकऱ्यांना या बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवयक झाले़ १९९६ पासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असले तरी पूर्वी दिलेल्या कर्जासाठी सदरील प्रमाणपत्र आवश्यक आहे़ अशा स्थितीत चार तालुक्यातील शेतकऱ्यांना येथे येवून प्रमाणपत्र घ्यावे लागते़ पूर्वी तर येथे रांगाच रांगा लागत़ बँकेचे व्यवहार बंद झाल्याने केवळ एकच कर्मचारी येथे बसून राहतो़ सध्या पीक कर्जासाठी धावपळ सुरू झाली आहे़ अशा स्थितीत प्रमाणपत्र घेण्यासाठी बँकेकडे फिरकावे लागते़ या संदर्भात बँकेत चौकशी केली असता चार तालुक्यातून आजही बाराशे शेतकऱ्यांच्या नावे कर्ज थकित आहे़ अशा खातेदारांत बहुसंख्य शेतकरी हयात नाहीत़ पण जमीन, मालमत्ता, शेती वारसा प्रमाणे मालक बदलले आहेत़ काहींनी बँकेचे कर्ज असतानाही शेतीविक्री केली आहे़ परिणामी शेतकऱ्यांना एकदा ना एकदा येथे येवून प्रमाणपत्र घ्यावेच लागते़ चाळीस वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराची कागदोपत्री नोंद येथे आहे़ एखादा शेतकरी संबंधित शेतीचा सातबारा आणला की संपूर्ण नोंदी तपासाव्या लागतात़ मालकांच्या हक्कात बदल झाल्याने बारकाईने पाहणी करावी लागते़ त्यामुळे २ ते ४ दिवस जातात़ बँकेचे व्यवहारच अठरा वर्षापापासून बंद असल्याने आॅनलाईन व्यवहाराचा येथे फायदाच होत नाही़ एकीकडे पीककर्ज, सातबारा आॅनलाईन होताना येथील बंद झालेल्या बँकेत तीच ती जिर्ण कागदपत्रे तपासून अधिकारी वैतागले आहेत़ शेतकरी मात्र गांधीनगरच्या भागात येवून बंद बँकेचा शोध घेवून हैराण होत आहेत़ (वार्ताहर)आजही बाराशे शेतकरी बँकेचे कर्जदार आहेत़ कर्जावर व्याज लावल्याने रकमेत वाढ झाली आहे़ कर्जदारांचे सातबारे बदलले असल्याने सर्व्हेनंबर व गटनंबर तपासावे लागतात व प्रमाणपत्र द्यावे लागते़ केवळ पीक कर्जाच्या वेळीस गर्दी होते - जी़एल़ पवार, बँक अधिकारी, बिलोली़ चार तालुक्यातील बँकांना बाराशे थकबाकीदारांच्या सर्व्हे नंबरची यादी पाठवावी़ जेणेकरून शेतकऱ्यांना प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता पडणार नाही़ आॅनलाईनवर सर्व्हेनंबरची नोंद झाल्यास आपोआपच सर्व बँकांना यादी कळेल - आबाराव संगनोड, अध्यक्ष, शेतकरी खरेदी विक्री संघ बिलोली