शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भू-विकास बँकेकडे शेतकऱ्यांचे हेलपाटे

By admin | Updated: June 18, 2014 01:28 IST

बिलोली : अठरा वर्षापासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असलेल्या भू-विकास बँकेकडे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बिलोली शाखेकडे हेलपाटे सुरू झाले आहेत़

बिलोली : अठरा वर्षापासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असलेल्या भू-विकास बँकेकडे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बिलोली शाखेकडे हेलपाटे सुरू झाले आहेत़ दरम्यान, बिलोली, धर्माबाद, उमरी व नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बिलोलीत पायपीट करावी लागत आहे़ एकाच बँक कर्मचाऱ्यावर भार असून ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत़शेतकऱ्यांची बँक म्हणून भू-विकास बँक परिचित होती़ पण बुडीत कर्जामुळे बँकेचे दिवाळे निघाले़ सन १९९६ मध्ये बँकेचे संपूर्ण व्यवहार बंद झाले़ पीक कर्ज देण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बँका सरसावल्यामुळे भू-विकास बँकेचे महत्त्व घटले व ही बँक केवळ नावाकरिता उरली़ पण शेती कर्जासाठी या बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नवीन कर्जधारकांना बँकेकडे हेलपाटे मारावे लागत आहेत़बिलोली, नायगाव व धर्माबादसह उमरी तालुक्यातील जवळपास २५० गावांसाठी बिलोलीची भू-विकास बँक होती़ परिणामी अशा गावातील शेतकऱ्यांना या बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवयक झाले़ १९९६ पासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असले तरी पूर्वी दिलेल्या कर्जासाठी सदरील प्रमाणपत्र आवश्यक आहे़ अशा स्थितीत चार तालुक्यातील शेतकऱ्यांना येथे येवून प्रमाणपत्र घ्यावे लागते़ पूर्वी तर येथे रांगाच रांगा लागत़ बँकेचे व्यवहार बंद झाल्याने केवळ एकच कर्मचारी येथे बसून राहतो़ सध्या पीक कर्जासाठी धावपळ सुरू झाली आहे़ अशा स्थितीत प्रमाणपत्र घेण्यासाठी बँकेकडे फिरकावे लागते़ या संदर्भात बँकेत चौकशी केली असता चार तालुक्यातून आजही बाराशे शेतकऱ्यांच्या नावे कर्ज थकित आहे़ अशा खातेदारांत बहुसंख्य शेतकरी हयात नाहीत़ पण जमीन, मालमत्ता, शेती वारसा प्रमाणे मालक बदलले आहेत़ काहींनी बँकेचे कर्ज असतानाही शेतीविक्री केली आहे़ परिणामी शेतकऱ्यांना एकदा ना एकदा येथे येवून प्रमाणपत्र घ्यावेच लागते़ चाळीस वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराची कागदोपत्री नोंद येथे आहे़ एखादा शेतकरी संबंधित शेतीचा सातबारा आणला की संपूर्ण नोंदी तपासाव्या लागतात़ मालकांच्या हक्कात बदल झाल्याने बारकाईने पाहणी करावी लागते़ त्यामुळे २ ते ४ दिवस जातात़ बँकेचे व्यवहारच अठरा वर्षापापासून बंद असल्याने आॅनलाईन व्यवहाराचा येथे फायदाच होत नाही़ एकीकडे पीककर्ज, सातबारा आॅनलाईन होताना येथील बंद झालेल्या बँकेत तीच ती जिर्ण कागदपत्रे तपासून अधिकारी वैतागले आहेत़ शेतकरी मात्र गांधीनगरच्या भागात येवून बंद बँकेचा शोध घेवून हैराण होत आहेत़ (वार्ताहर)आजही बाराशे शेतकरी बँकेचे कर्जदार आहेत़ कर्जावर व्याज लावल्याने रकमेत वाढ झाली आहे़ कर्जदारांचे सातबारे बदलले असल्याने सर्व्हेनंबर व गटनंबर तपासावे लागतात व प्रमाणपत्र द्यावे लागते़ केवळ पीक कर्जाच्या वेळीस गर्दी होते - जी़एल़ पवार, बँक अधिकारी, बिलोली़ चार तालुक्यातील बँकांना बाराशे थकबाकीदारांच्या सर्व्हे नंबरची यादी पाठवावी़ जेणेकरून शेतकऱ्यांना प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता पडणार नाही़ आॅनलाईनवर सर्व्हेनंबरची नोंद झाल्यास आपोआपच सर्व बँकांना यादी कळेल - आबाराव संगनोड, अध्यक्ष, शेतकरी खरेदी विक्री संघ बिलोली