शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

जाचक जाचक अटींमुळे शेतकऱ्यांचा आखडता हात

By admin | Updated: September 15, 2015 00:25 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई तांत्रिक अडचणीत अंबाजोगाई तालुक्यात ४३८ विहिरींचे काम रखडले आहे तर शेततळ्याचे २६ प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र त्यातील तेराच शेततळ्यांना मंजुरी मिळाली आहे.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईतांत्रिक अडचणीत अंबाजोगाई तालुक्यात ४३८ विहिरींचे काम रखडले आहे तर शेततळ्याचे २६ प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र त्यातील तेराच शेततळ्यांना मंजुरी मिळाली आहे.दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी शासनाच्या पंचायत समिती व कृषि विभागाच्या माध्यमातून एम.आर.ई.जी.एस. यांच्या वतीने शेततळी व विहिरींना अनुदान देऊन जमीन ओलिताखाली आणण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु रोहयोच्या माध्यमातून कामे करतांना जॉबकार्ड व इतर जाचक अटींमुळे मंजुरी मिळूनही कामे केली जात नाहीत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी व शेतमजुरांना त्या-त्या गावांमध्ये रोजगाराची उपलब्धी व्हावी यासाठी एम.आर.ई.जी.एस. च्या माध्यमातून गावोगावी विहिरी व शेततळे निर्मितीसाठी अनुदान दिले जाते. या कामांच्या माध्यमातून मजुरांना काम तर शेतकऱ्याची जमीन सिंचनाखाली यावी. हा प्रमुख उद्देश असतो. परंतु शासनाच्या जाचक अटी व लालफितीच्या कारभारामुळे या योजना पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशाही स्थितीत मंजूर झालेल्या योजनेचे काम पूर्ण होऊन त्या योजनेचे अनुदान मिळेपर्यंत शेतकऱ्यांस किमान दोन वर्षे कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. अंबाजोगाई तालुक्यात आजपर्यंत कृषि विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ४७० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र गेल्या दोन वर्षात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे झाली नाहीत. या वर्षी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २६ शेततळ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यातील १३ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही कामे आता सुरू करण्यात येणार असल्याचे कृषि विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतात विहिर घेण्यासाठी अनुदान दिले जाते. आजपर्यंत १३६० विहिरींना मंजुरी मिळाली त्यापैकी ९७१ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. ४३८ विहिरींचे काम तांत्रिक अडचणींमुळे रखडले आहेत. आगामी काळात २०० विहिरींना मंजुरी मिळाली आहे. तर ९८ विहिरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही कामे करतांना जॉबकार्ड व विविध तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्यामुळे ही कामे मार्गी लागेपर्यंत त्यातच मिळणारा निधी हे अग्निदिव्य पार करतांना शेतकऱ्यांची मोठी कोंडी होते.