शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

शेतकरी धान्य योजनेला ग्रहण!

By admin | Updated: February 28, 2017 00:47 IST

लातूर : फेब्रुवारी महिन्याचे नियतन अद्याप आले नसल्याने जिल्ह्यातील पावणे चार लाख लाभार्थी शेतकऱ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा आहे.

लातूर : दुष्काळामुळे शेतकऱ्यांसाठी एपीएल धान्य वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र फेब्रुवारी महिन्याचे नियतन अद्याप आले नसल्याने जिल्ह्यातील पावणे चार लाख लाभार्थी शेतकऱ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा आहे. २०१६ च्या डिसेंबर महिन्यात धान्य कोटा आला होता. त्यानंतर कोटा आला नसल्याने योजना बंद पडली की काय, अशी भीती लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये आहे.केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने स्वस्त धान्य योजना शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली असून, लातूर जिल्ह्यात ३ लाख ७० हजार ९९४ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ अल्प दरात देण्याची ही योजना आहे. तांदूळ ३ रुपये किलो, तर गहू २ रुपये किलो दराने या लाभार्थ्यांना दिला जातो. त्यासाठी २०१६ च्या डिसेंबर महिन्यात जानेवारीपर्यंतचा कोटा आला होता. गहू १११२.७ मेट्रिक टन तर तांदूळ १७४१.७ मेट्रिक टन आला. त्याचे वाटपही करण्यात आले. मात्र जानेवारीनंतर नियतन कोटा आला नाही. गहू व तांदळाच्या खरेदीचे दर वाढले आहेत. गव्हाचे प्रती टन ८१९० रुपयांनी तर तांदळाचे ३२ हजार ६६७ रुपयांनी दर वाढले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ही योजना असल्याने आणि नव्या खरेदीत दर वाढल्यामुळे विलंब होत असल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ही योजना सुरू आहे. परंतु, दरवाढीमुळे लाभार्थ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा करावी लागत आहे. डिसेंबरनंतर नियतन कोटा मंजूर झाला नव्हता. परंतु, आता १११२.७ मेट्रिक टन गहू आणि ७७१.७ मेट्रिक टन तांदूळ मंजूर झाला आहे. फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचा नियतन कोटा राज्य शासनाकडून मंजूर झाला