शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शेतकऱ्यांना मिळणार धनादेशाद्वारे मालाचे पैसे

By admin | Updated: November 16, 2016 00:13 IST

जालना : आठवडाभरापासून पाचशे व हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने सर्वच व्यवहारावर परिणाम होत आहे.

जालना : आठवडाभरापासून पाचशे व हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने सर्वच व्यवहारावर परिणाम होत आहे. यात बाजार समितीही सुटलेली नाही. शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेता शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाची रक्कम धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे. जालना बाजार समितीत भुसार, किरणा, भाजीपाला, कापूस, सोयाबीन, मोसंबी आदी बाजारपेठेत दिवसाकाठी कोट्यवधींची उलाढाल होते. शेकडो शेतकरी दिवसाकाठी विविध धान्ये भुसार बाजारात आणतात. शेतकऱ्यांना माल विक्री केला लगेच पैसे मिळत. मात्र हजार व पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद झाल्या त्यासोबचत नवीन चलनाचा तुटवडा भासत आहे. रोख रक्कम शेतकऱ्यांना देणे व्यापाऱ्यांना जिकिरीचे होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची जी काही माल विक्रीची रक्कम आहे ती धनादेशाद्वारे देण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडूनही या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचा बँकेत खाते असतेच. यामुळे धनादेश दिला म्हणजे काही अडचण येण्याचा प्रश्न नाही. थेट पैसे खात्यात जमा होतात. गत काही दिवसांपासून सोयाबीन व कापसाची आवक होत आहे. सोयाबीनच मंगळवारी ४ हजार १७५ तर मका ४५३८ एवढी आवक इतर शेतीमालाची आवकही बऱ्यापैकी होत आहे.यामुळे शेतकरीही धनादेश स्वीकारत असल्याचे आडत व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजार समिती यार्डात खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस सुरू आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कापसाची रक्कम धनादेशाद्वारे स्वीकारावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर, उपसभापती भास्कर दानवे, सचिव गणेश चौगुले यांनी केले. (प्रतिनिधी)