शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षेचे धान्य शेतकऱ्यांना मिळेना

By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST

जालना : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आलेली आहे.

जालना : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आलेली आहे. असे असले तरी, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक स्वस्तधान्य दुकानावर धान्य मिळण्यास अडचणी येत आहेत. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात कसबसे धान्य वाटपानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थेच झाली आहे. पुरवठा विभाग व स्वस्तधान्य दुकानदारांमुळे धान्य मिळणे जिकिरीचे झाले आहे.यंदा तर संपूर्ण खरीप हंगामच हातचा गेल्याने संकटात आणखीच भर पडली.अन्न सुरक्षे योजनेंतर्गत २ रुपये प्रतिकिलो गहू तर ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ देण्याचा निर्णश शासनाने घेतला आहे. यासाठी वेगळे नियोजनही करण्यात आले आहे. मात्र या योजनेसाठी धान्यच कमी येत असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. आठही तालुक्यात मिळून १२८८ स्वस्तधान्य दुकानातून अन्न सुरक्षेचे धान्य पुरवठा करण्याच्या सूचना आहेत. दुकानांची संख्या मोठी असली तरी अनेक दुकाने परस्परांना जोडलेली अथवा काही दुकाने निलंबित आहेत. लाभार्थ्यांनुसार सर्व दुकानांना धान्य पुरवठा करण्यात येत असल्याचा दावा पुरवठा विभाग करत असला तरी शेतकऱ्यांना या दराने धान्य मिळतेच असे नाही. अनेकदा हे धान्य जादा दराने विक्री केले जाते. अन्न सुरक्षेचे धान्याचे होणारे नियतन कमी होत असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे ११ लाख ९६ हजार लाभार्थींना दरमहा ३० हजार क्विंटल गहू तर २० हजार क्विंटलपेक्षा अधिक तांदळचा पुरवठा केला जातो. नियमित लाभार्थींसाठीच काही वेळा पुरवठा कमी होतो.जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानदारांना सुलभ धान्य पुरवठा व्हावा, या हेतूने सुरू करण्यात येणारी द्वारपोच अन्नपुरवठा योजना पुन्हा लालफितीत अडकली आहे. ४स्वस्तधान्य दुकानदारांना तालुका ठिकाणच्या गोदामात येऊन धान्य घेऊन जावे लागते. हे धान्य वाहतूक करताना अनेक अडचणी येतात. काही वेळा धान्य पुरवठाही कमी होतो. काही वेळेस धान्य मिळत नाही, काळा बाजार आदींचा सामना रेशन दुकानदारांना करावा लागतो. एकूणच स्वस्त धान्याचा काळा बाजार रोखावा, धान्य गावात वेळेत पोहचावे यासाठी शासनाने द्वारपोच धान्य पुरवठा योजना सुरू केली. मात्र ही योजना लालफितीच्या कारभारात अडकली असल्याचे चित्र आहे.