शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

पाटोद्यात मदतीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: August 13, 2014 00:59 IST

पाटोदा : जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी

पाटोदा : जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी या मागणीसाठी बालाघाट विकास आघाडीच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांच्या घोषणांनी उपविभागीय कार्यालय दणाणले होते. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर हा भाग डोंगरी विभागात येतो. येथे दरवर्षीच पावसाचे प्रमाण अल्प असल्याने येथील शेतकऱ्यांच्या दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो. यामुळे येथे शेतकरी सतत आर्थिक संकटात असतात. कधी दुष्काळ तर कधी गारपीट याने शेतकरी अधिकच खचलेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे प्रमाण अल्प असले तरी सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. पेरणीनंतर पाऊसच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बियाणे, मशागत यावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ८०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे पीक कर्ज घेतले आहे. पाऊसच नसल्याने हे कर्ज फेडणार कसे? असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, पीक कर्जाला व्याज न लावता नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांतून विहिरी खोदल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे अद्याप पैसेच न आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यामुळे या विहिरींचे पैसे देण्याची मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली. पाटोदा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरीही मोठ्या प्रमाणावर आहेत. या शेतकऱ्यांना कांदाचाळसाठी अनुदान द्या, अशी मागणीही यावेळी केली. पाटोदा तालुक्यासह जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. २०० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. या द्वारे दुषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, पशुधनासाठी छावण्याऐवजी शेतकऱ्यांना रोख रक्कम मदत द्यावी.पन्नास वर्षांवरील शेतकऱ्यांना मासिक तीन हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे, अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली. गंभीर बाब म्हणजे दुष्काळाच्या भयाने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्येचे सत्र जिल्ह्यात वाढू नये यासाठी तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलकांमध्ये बालाघाट विकास आघाडीचे प्रमुख विष्णुपंत घोलप, राजाभाऊ देशमुख, दिलीप रंधवे, पांडुरंग दगडखैर, राहूल चौरे, महादेव नागरगोजे, हरिदास शेलार, बाळासाहेब जायभाये, महेश आजबे आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रभारी तहसीलदार भारत सूर्यवंशी, गणेश जाधव यांना निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)