शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड

By admin | Updated: August 1, 2014 01:04 IST

परळी/मांडवा: तालुका परिसरात पाऊस समाधानकारक नसल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. दोन मोठ्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या.

परळी/मांडवा: तालुका परिसरात पाऊस समाधानकारक नसल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. दोन मोठ्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. आता पावसाने पुन्हा दडी मारली असल्यामुळे शेतकरी पीक विमा भरण्यासाठी सरसावले असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये सकाळी ९ वाजेपासूनच गर्दी होत आहे.पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. त्यामुळे गुरुवारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेसमोर सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. गेल्या तीन दिवसांपासून असेच चित्र पहावयास मिळत आहे. बँकेसह तलाठी कार्यालयातही तोबा गर्दी झाली आहे. सातबारा वेळेवर मिळत नसल्याने सकाळपासून शेतकरी तेथे जाऊन थांबले होते. सातबारा मिळाल्यानंतर पुन्हा बँकेच्या दारात जाऊन थांबले होते. पूर्वी पीक विम्याकडे अनेकांनी कानाडोळा केला होता. मात्र आता पाऊस बेभरवशाचा झाला असल्यामुळे शेतकरी पीक विमा भरण्यास प्राधान्य देत आहेत. दरम्यान, ७ जून रोजी सुरु होणारा पाऊस ७ जुलैपासून सुरू झाला होता. त्यानंतरच्या कालावधीत तालुका परिसरात केवळ दोन ते तीन मोठे पाऊस झाले आहेत. या पावसावरच शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या उरकल्या होत्या. पिके उगवली असताच पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना अक्षरश: बकेटीत पाणी नेऊन उगवलेल्या पिकांना तांब्याने पाणी टाकले. पिकांना जगविणे हेच त्यांचे ध्येय बनले आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी आता चिंतित झाले आहेत. पाऊस जर पडला नाही तर उगवलेली पिके पुन्हा पाण्याअभावी सुकून जातील. शेतकऱ्यांनी मोठ्या मुश्किलीने पैसे गोळा करुन पेरण्या केल्या होत्या. आता पावसाने धोका दिला असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच तर पीकविमा भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी गर्दी दिसून येत आहे. गुरुवारी पीकविमा भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे बँकेत शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती. त्यामुळे तालुक्यातील किती शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे, याची माहिती रात्रीपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. (वार्ताहर)